शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक; राजेश टोपेंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:04 IST

शरद पवारांनी नेहमी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केल्याचं राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे शिबिर होत आहे. आज या शिबिराचा दुसरा दिवस असून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांनी भाषण करत कार्यकर्त्यांना आवाहन केले. 

राजकारणातील कुठेतरी निष्ठा व नैतिकता लोप पावत असताना आजचा हा विचार फार महत्वाचा आहे. सह्याद्री कधी हिमालयापुढे झुकला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला. भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले. 

राजकारणाच्या गढूळ वातावरणात निष्ठावान व चांगले लोक राहावेत हे मतदार बघत आहेत. निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचे महत्व वेगळे आहे, त्यामुळे आपल्याला निष्ठेची ज्योत तैवत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्ती स्थळ व आश्वासक चेहरा हे शरद पवार आहेत व तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत. शरद पवार एक व्यक्ती नाहीत तर ती एक विचारधारा आहे, त्यामुळे या विचारांना अनुसरून आपण आपल्या पक्षाला विजयाकडे घेऊन जायचे आहे. शरद पवारांनी नेहमी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केल्याचं राजेश टोपे म्हणाले.

आज आपला देश सातत्याने धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करत आहे व माणसात माणूसपण ठेवत नाही आहे म्हणून 'देश गलत लोग चला रहे है' अशी परिस्थिती आहे. या विचारधरेला विरोध करण्यासाठी शरद पवार काम करत आहेत, त्यांना साथ देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. शरद पवारांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे लढले पाहिजे. शरद पवारांचा तरुण पिढीवर विश्वास आहे व त्यांना त्यांच्यातच आपल्या पक्षाचे भविष्य दिसत आहे. शरद पवारांनी आपल्या रक्तात भिनलेल्या पुरोगामी विचारांनी राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं राजेश टोपेंनी सांगितले.

राज्यामध्ये नोकर भरती केली जात नाहीय- 

शरद पवारांच्या विचारांना पाईक असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तरुणांसाठी या सरकारने काय केले? सर्व मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात आहेत, यासाठी गावागावातील तरुणांना जागरूक करण्याचे काम केले पाहिजे. राज्यामध्ये नोकर भरती केली जात नाही, आरोग्यसारख्या महत्वाच्या विभागामध्ये देखील नाही. जातीवाद व महागाई यांसारख्या गोष्टींवर बोलण्याची अत्यंत गरज आहे. सध्या हे लोक फार खूणशी राजकारण करत आहेत, आपल्याला संघर्ष करावे लागेल. शरद पवारांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या सोबत असताना आपण घाबरून जाण्याचे काम नाही, आपल्याला धाडसी वृत्ती मनामध्ये ठेवावी लागेल.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRajesh Topeराजेश टोपेMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस