शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

...तर अख्ख्या देशात आरक्षणाचा विषय पेटेल, भूलथापांना बळी पडू नका; राज ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:49 IST

ज्याप्रकारे भूलथापा देऊन जातीजातीत विष कालावून तुमच्याकडून मते घेतात, त्यानंतर तुमची प्रतारणा करतात हे तुम्ही ओळखणे गरजेचे आहे असंही राज ठाकरेंनी सांगितले. 

नाशिक - Raj Thackeray on Maratha Reservation ( Marathi News ) महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी जातीचे विष पसरवलं जात आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले, मी गेलो होतो त्यांच्यासमोर सांगितले हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाही. तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नव्हते. मागे इतके मोर्चे निघाले पुढे काय झाले? महाराष्ट्रातील माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका, जी गोष्ट होऊ शकत नाही ती आश्वासने हे लोक देतायेत असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाला दिले आहे. 

नाशिकच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे म्हणाले की, आज मूळ प्रश्न शिक्षण, नोकरीचा आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण, नोकरी देऊ शकत नाही. बाहेरचे लोक आमच्या राज्यात पोसायचे आणि आपल्याकडील लोक आंदोलन करतात. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, रोजगार देणे हे सहजपणे शक्य आहे. परंतु तुम्ही मराठी म्हणून एकत्र राहू नये, महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून वेगवेगळ्या जातीत विष कालवायचे. मराठा झाल्यावर ओबीसी, त्यानंतर वेगवेगळे, तुमची जेवढी मते विभागली जातील ते या लोकांसाठी फायद्याची आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र यायला नको म्हणून तुमच्यात विष कालवण्याचे जे धंदे आहेत ते ओळखा असंही त्यांनी सांगितले. 

तसेच  हा फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विषय नाही तर प्रत्येक राज्यातील तिथल्या समाजाचा विषय आहे. एका जातीचा विषय कोर्टात गेला तर या देशातील प्रत्येक जाती उभ्या राहतील आणि आरक्षणाचा विषय अख्ख्या देशात पेटेल, जे होऊ शकत नाही, जे सुप्रीम कोर्टात होऊ शकत नाही. त्यासाठी लोकसभेचे अधिवेशन घ्यावे लागेल. कधीतरी वकिलांशी बोला, मी खोटे सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल बोललो होतो. हा पुतळा उभा राहू शकत नाही हे मी बोललो होतो. इथं समुद्रात उभं करायचे असेल तर भरणी टाकावी लागेल. भरणी टाकून स्मारक करायचे असेल तर किमान २५-३० हजार कोटी लागतील असं राज ठाकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, शिवछत्रपतींचे खरी स्मारके हे गडकिल्ले आहेत. भविष्यातील पिढ्यांना आपण पुतळे दाखवणार आहोत? आमच्या राजाचे मोठेपण, कर्तृत्व, यश हे गडकिल्ल्यात आहेत. पूर्वी होते तसे गडकिल्ले झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकतो. आज किती वर्ष अरबी समुद्रातील पुतळा उभारायचा आहे हे सांगतायेत, एवढ्या वर्षात वल्लभभाई पटेलांचा पुतळा झाला. हा पुतळा समुद्रात उभा राहू शकत नाही. ज्याप्रकारे भूलथापा देऊन जातीजातीत विष कालावून तुमच्याकडून मते घेतात, त्यानंतर तुमची प्रतारणा करतात हे तुम्ही ओळखणे गरजेचे आहे असंही राज ठाकरेंनी सांगितले. 

सर्व जातींना एकत्र घेऊन महाराष्ट्र घडवूया

आज १८ वा वर्धापन दिन आहे. आपण एक शपथ घेऊया.. जे जे काही शक्य असेल ते ते मी या महाराष्ट्रासाठी करेन. जे शक्य असेल ते हिंदुंसाठी, हिंदू समाजासाठी आणि मराठी माणसांसाठी करेन. आत्ताचे राजकारण हे अळवावरचं पाणी आहे त्यातून हाताला काही लागणार नाही. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जो महाराष्ट्र पूर्वी होता तो महाराष्ट्र उभा करायचा आहे. मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कुणी कुणालाही जातीने पाहिलेले चालणार नाही. शिवछत्रपतींचे नाव घ्यायचे आणि जातीजातीत भेद करायचे? सर्व जातींनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न आपण पाहूया. निवडणुकीचे काय निर्णय घ्यायचे हे लवकरच सांगेन, तोपर्यंत संयम ठेवा असंही राज ठाकरे यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaratha Reservationमराठा आरक्षण