शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Raj Thackeray Speech MNS Meeting : मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:49 IST

Raj Thackeray in Mumbai: राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. 

गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या लोकांनी जी काही वाट लावलीय, त्यामुळे हिप रिप्लेसमेंटची सर्जरी केली. गेल्या वर्षी हाड पंक्चर करून इंजेक्शन दिले होते. परंतू वर्षभराने पुन्हा दुखणे बळावले. डॉक्टर म्हणाले की पहिल्या चार-पाच महिन्यात त्रास दिसतो, वर्षभराने नाही. मी उद्या पुण्याला जाऊन येणार आहे. एका दिवसासाठी. बैठका वगैरे लावू नका. मला त्रास होत नाहीय, पण एकदा तपासून पहायचे आहे. नाशिकलाही देवीच्या दर्शनाला जायचे आहे, असे राज ठाकरेंनीमनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन केले. 

राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. खोटा प्रचार केला जातोय. तुम्ही सक्षम आहात, तुम्हाला कान आहेत, मेंदू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जी काही उत्तरे द्यावी लागतात ती थांबवा. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे, मनसे आंदोलने अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा. टोल आंदोलन आम्ही ६०-६५ टोलनाके बंद पाडले. शिवसेना-भाजपाच्या अजेंड्यात होते, त्यांना हे विचारायला जात नाहीत, सगळ्या जिल्ह्यांत टोल नाके सुरु आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

टोल नाक्यांद्वारे पैसे गोळा करतात, त्यातून निवडणुकीत केलेला खर्च काढला जातो. हे टोलनाके किती दिवस सुरु राहणार आहेत हा आपला पहिला प्रश्न होता. त्यात रोखीने पैसे येतात ते कुठे जातात याचे उत्तर आम्हाला अद्याप सरकारने दिलेले नाही. आमच्या हातात सत्ता द्या, मी बंद करून दाखवतो, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले. टोलनाकेवाले या लोकांना पैसा पुरवितात, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. भोंग्यांचे आंदोलन जे केले त्यावर पोलिसांनी म्हटलेय ९३ टक्के भोंगे बंद झालेत. जे सुरु आहेत ते कमी आवाजात अधिकृत सुरु आहेत. मी ते पत्र तुमच्या हातात दिले, मी ते सोशल मीडियावर टाकू शकलो असतो. पण तुमचा आणि लोकांचा कनेक्ट किती आहे ते मला पहायचे होते. अनेक मनसैनिकांनी मला सांगितले की आम्हाला ते पत्र मिळाले नाही नाहीतर आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवले होते. थंड पडलेत. निवडणुकीचे वारे सुरु आहेत, त्यांच्या मनात. हे जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नाहीय. मतदारांना कळत नसेल की कोणाला मतदान केले. हे राजकारण नाही, तर तात्पुरती आर्थिक अॅडजस्टमेंट आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.  

मनोहर जोशी होते...मी बाळासाहेबांना बाहेर पडतोय म्हणून सांगायला गेलो, तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मीठी मारली आणि मला म्हणाले जा. त्यांना समजले होते. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आम्ही जेवढी आंदोलने केलीत, तेवढी कुणीच केली नाहीत आणि यशस्वीही केली नाहीत. माझे भाषण सुरु असताना ठाण्यात खळ्ळकण आवाज आला. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची पत्रे आली. एका आठवड्याची वेळ दिली, त्यानंतर महाराष्ट्रात मराठीत आवाज ऐकू येऊ लागला, असेही राज ठाकरे म्हणाले.  

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे