शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

Raj Thackeray Speech MNS Meeting : मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:49 IST

Raj Thackeray in Mumbai: राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. 

गेल्या काही वर्षांत माझ्या जवळच्या लोकांनी जी काही वाट लावलीय, त्यामुळे हिप रिप्लेसमेंटची सर्जरी केली. गेल्या वर्षी हाड पंक्चर करून इंजेक्शन दिले होते. परंतू वर्षभराने पुन्हा दुखणे बळावले. डॉक्टर म्हणाले की पहिल्या चार-पाच महिन्यात त्रास दिसतो, वर्षभराने नाही. मी उद्या पुण्याला जाऊन येणार आहे. एका दिवसासाठी. बैठका वगैरे लावू नका. मला त्रास होत नाहीय, पण एकदा तपासून पहायचे आहे. नाशिकलाही देवीच्या दर्शनाला जायचे आहे, असे राज ठाकरेंनीमनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन केले. 

राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. खोटा प्रचार केला जातोय. तुम्ही सक्षम आहात, तुम्हाला कान आहेत, मेंदू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जी काही उत्तरे द्यावी लागतात ती थांबवा. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे, मनसे आंदोलने अर्धवट सोडतात. एक आंदोलन दाखवा. टोल आंदोलन आम्ही ६०-६५ टोलनाके बंद पाडले. शिवसेना-भाजपाच्या अजेंड्यात होते, त्यांना हे विचारायला जात नाहीत, सगळ्या जिल्ह्यांत टोल नाके सुरु आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

टोल नाक्यांद्वारे पैसे गोळा करतात, त्यातून निवडणुकीत केलेला खर्च काढला जातो. हे टोलनाके किती दिवस सुरु राहणार आहेत हा आपला पहिला प्रश्न होता. त्यात रोखीने पैसे येतात ते कुठे जातात याचे उत्तर आम्हाला अद्याप सरकारने दिलेले नाही. आमच्या हातात सत्ता द्या, मी बंद करून दाखवतो, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले. टोलनाकेवाले या लोकांना पैसा पुरवितात, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. भोंग्यांचे आंदोलन जे केले त्यावर पोलिसांनी म्हटलेय ९३ टक्के भोंगे बंद झालेत. जे सुरु आहेत ते कमी आवाजात अधिकृत सुरु आहेत. मी ते पत्र तुमच्या हातात दिले, मी ते सोशल मीडियावर टाकू शकलो असतो. पण तुमचा आणि लोकांचा कनेक्ट किती आहे ते मला पहायचे होते. अनेक मनसैनिकांनी मला सांगितले की आम्हाला ते पत्र मिळाले नाही नाहीतर आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवले होते. थंड पडलेत. निवडणुकीचे वारे सुरु आहेत, त्यांच्या मनात. हे जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगले नाहीय. मतदारांना कळत नसेल की कोणाला मतदान केले. हे राजकारण नाही, तर तात्पुरती आर्थिक अॅडजस्टमेंट आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.  

मनोहर जोशी होते...मी बाळासाहेबांना बाहेर पडतोय म्हणून सांगायला गेलो, तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मीठी मारली आणि मला म्हणाले जा. त्यांना समजले होते. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आम्ही जेवढी आंदोलने केलीत, तेवढी कुणीच केली नाहीत आणि यशस्वीही केली नाहीत. माझे भाषण सुरु असताना ठाण्यात खळ्ळकण आवाज आला. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची पत्रे आली. एका आठवड्याची वेळ दिली, त्यानंतर महाराष्ट्रात मराठीत आवाज ऐकू येऊ लागला, असेही राज ठाकरे म्हणाले.  

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे