शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Raj Thackeray: "आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवस-रात्र बरनॉल लावत असतो"; असं का म्हणाले राज ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:49 IST

राज ठाकरेंनी मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नाला दिलं मजेशीर उत्तर

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कायम कोणत्याही विषयावर अतिशय सडेतोड मत मांडत असतात. आज मराठी भाषा गौर दिनानिमित्त राज ठाकरे यांची नवी मुंबईत एक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राज यांनी विविध विषयांवर भाष्य केले. केवळ राजकारणच नव्हे तर मराठी भाषा, साहित्य अशा विषयांवर त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले. याच वेळी एका राजकीय विषयावर भाष्य करताना त्यांनी अस्सल ठाकरी शैलीत विधान केले.

काही दिवसांपूर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे पक्षचिन्ह अशा दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला देण्याचा निर्णय राष्ट्रीय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी या निर्णयावर टीका केली. ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, पण कोर्टाने निवडणूक आयोग योग्य असल्याचेच म्हटले. मनसेकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केल्यानंतर, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कधीही मनसे या पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगू शकतात, असे मीम्स व्हायरल झाले होते. या विषयावर राज ठाकरेंनी रोखठोक मत मांडले.

"बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचा कार्यक्रम विधानभवनात पार पडला. त्यावेळी उपस्थित लोकांमध्ये कोण कुठल्या पक्षाचे हेच कळत नव्हतं. एखादा माणूस समोरून येऊन म्हणायचा- साहेब, नमस्कार, मी आमदार आहे... तेव्हा मला विचारावं लागायचं- कुठला? मग पुढे मी विचाराचयो की, हल्ली तो एखादा आमदार काय करतो? मग त्यावर मला ते लोक सांगायचे की- तो आमदार आता दुसऱ्या पक्षात गेला. मला आता आमच्या राजू पाटीलना विचारायचं आहे की, (तुम्ही पक्षाची जबाबदारी) घेता का? एकदा हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवस-रात्र बरनॉल लावत असतो," अशा शब्दांत राज ठाकरेंनी खिल्ली उडवणाऱ्यांना सुनावलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेmarathiमराठीNavi Mumbaiनवी मुंबई