शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:31 IST

Raj Thackeray And Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Raj Thackeray And Manoj Jarange Patil: शासनाने सगेसोयरेबाबत अधिसूचना काढली, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र वाटप होत नाही. सगेसोयरेबाबत कायदा तयार करून तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगारणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मीडियाशी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांना त्या दिवशी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर्वांसमोर सांगितले होते की, हे होणार नाही. हा विषय तांत्रिक आहे. हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. अशा प्रकारचा निर्णय कोणत्याही राज्याचे सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला करायचे असेल, तर प्रत्येक राज्यात अशी परिस्थिती आहे. मग प्रत्येक राज्यात हे कसे करणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे लागेल. यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. ही गोष्ट इतकी सोपी नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे की...

मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे की, मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले. मुंबईत महामोर्चा आला. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. आताही तेच झाले. वस्तुस्थिती कोणी पाहणार आहे की नाही. कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि मोर्चे म्हणून तुम्हाला घेऊन येत आहेत. हे प्रत्येक समाजाने पाहिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मग आता पुन्हा उपोषणाला का बसताय?

त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. ते तिथून बाहेर पडल्यानंतर विजयोत्सव साजरा झाला. काय विजय मिळाला? कोणता विजय? हे तर समजू देत. जे मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते, त्यांना कळले का काय झाले ते? आणि जर झालेले नाही आणि तुम्ही आनंद व्यक्त केला होता, मग आता पुन्हा उपोषणाला का बसताय? तुमच्यामते ती गोष्टी आता झाली ना. मग आता पुन्हा उपोषण कशासाठी? मी जे बोलतो ते कडवट वाटते नंतर ते कळते सत्य आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण