शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, विजयोत्सव केला मग आता पुन्हा उपोषण का?; राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:31 IST

Raj Thackeray And Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Raj Thackeray And Manoj Jarange Patil: शासनाने सगेसोयरेबाबत अधिसूचना काढली, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. त्यामुळे प्रमाणपत्र वाटप होत नाही. सगेसोयरेबाबत कायदा तयार करून तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उगारणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिला. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

मीडियाशी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांना त्या दिवशी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर्वांसमोर सांगितले होते की, हे होणार नाही. हा विषय तांत्रिक आहे. हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे. अशा प्रकारचा निर्णय कोणत्याही राज्याचे सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला करायचे असेल, तर प्रत्येक राज्यात अशी परिस्थिती आहे. मग प्रत्येक राज्यात हे कसे करणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे लागेल. यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. ही गोष्ट इतकी सोपी नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे की...

मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार केला पाहिजे की, मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले. मुंबईत महामोर्चा आला. ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. आताही तेच झाले. वस्तुस्थिती कोणी पाहणार आहे की नाही. कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि मोर्चे म्हणून तुम्हाला घेऊन येत आहेत. हे प्रत्येक समाजाने पाहिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मग आता पुन्हा उपोषणाला का बसताय?

त्या दिवशी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. ते तिथून बाहेर पडल्यानंतर विजयोत्सव साजरा झाला. काय विजय मिळाला? कोणता विजय? हे तर समजू देत. जे मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते, त्यांना कळले का काय झाले ते? आणि जर झालेले नाही आणि तुम्ही आनंद व्यक्त केला होता, मग आता पुन्हा उपोषणाला का बसताय? तुमच्यामते ती गोष्टी आता झाली ना. मग आता पुन्हा उपोषण कशासाठी? मी जे बोलतो ते कडवट वाटते नंतर ते कळते सत्य आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण