शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक झाली?; १९८८ ची बाळासाहेब ठाकरेंची सभा पाहिलेले लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 08:07 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे हिंदुत्वाचे आणि लोकांच्या मनातले होते असंही कुटुंबाने सांगितले.

औरंगाबाद – शहरात मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांच्या सभेनंतर आता १९८८ मध्ये झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेशी तुलना केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरेच पुढे घेऊन जातील असं मनसेकडून सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंची सभा ज्या मैदानावर झाली. तिथेच बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी १९८८ मध्ये सभा घेतली होती. या सभेनंतर शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर हळूहळू शिवसेनेचा मराठवाड्यात विस्तार झाल्याचं दिसून आले.

राज ठाकरेंनी घेतलेल्या सभास्थळी शेजारील असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये जोशी कुटुंब राहतं. या फ्लॅटमधून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा बघितली होती. ग्राऊंडसोबत तिन्ही रोड प्रचंड गर्दी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची गर्दी होती त्यापेक्षा २ टक्के गर्दी राज ठाकरेंच्या सभेत कमी पाहायला मिळाली. ९८ टक्के गर्दीने राज ठाकरेंची सभा भरली होती. त्याकाळी जसा जल्लोष,उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता तोच आजही पाहायला मिळाला. असं कुटुंबाने सांगितले. पण या गर्दीत जास्तीत जास्त तरूण पाहायला मिळाले. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे हिंदुत्वाचे आणि लोकांच्या मनातले होते असंही कुटुंबाने सांगितले.

काय म्हणाले राज ठाकरे?

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विराट सभेत बोलताना राज यांनी औरंगाबादेतच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात, नंतर उत्तर व पश्चिम महाराष्ट्र व पुढे कोकणात अशा सभा घेणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य करीत राज्यात जातीय विष कालवू नका, असे आवाहन केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुल्लेखांनी मारत शहरातील आठ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरदेखील बोट ठेवले.

४५ मिनिटांच्या सभेत ठाकरे यांनी इतिहासाचे दाखले देत संदर्भ सादर केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांतील हवाला देत पवार यांच्यावर टीका करीत त्यांना ‘हिंदू’ या शब्दाची ॲलर्जी असल्याचा घणाघात केला. देवगिरी, पैठण या राजधान्या, खिलजीने केलेले अतिक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना घेऊन निर्माण केलेले साम्राज्य यावर प्रकाश टाकून राज यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे