शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

वेळीच सुधरा अन्यथा पुढच्या मोर्च्यात खळखट्याक, राज ठाकरेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:51 IST

रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणांनी वेळीच कामात सुधारणा करावी अन्यथा पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबई - भारतीय रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणांनी आपल्या कामात सुधारणा केली नाही, तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेची गाडी पुन्हा खळखट्याकचा मार्ग अवलंबेल असा सूचक इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका करताना राज ठाकरे यांनी तुम्ही सगळ्या भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहेत, तुमच्याइतका खोटारडा पंतप्रधान मी बघितला नाही असा आरोप केला.

पश्चिम व मध्य अशा दोन्ही रेल्वे स्थानकांच्या भवताल असलेल्या फेरीवाल्यांचा दाखला देत 15 दिवसांच्या आत जर हे फेरीवाले हटवले गेले नाहीत तर ते काम माझ्या पक्षाचे कार्यकर्ते करतील असे राज म्हणाले. एलफिन्स्टन पुलावर 29 सप्टेंबर रोजी 23 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संताप मोर्चाचे आयोजन दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ राज ठाकरे यांनी केले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

- इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये. त्यामुळे हा संताप आहे.    ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करतायत. म्हणून माझा मोदींवर राग आहे. या देशाने इतकं प्रेम दिलं, विश्वास टाकला त्यांच्यासाठी काय करताय? 

- भाषणादरम्यान राज ठाकरेंची नितीन गडकरीवरही टीका, अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूकचा दिला संदर्भ. याचा अर्थ अच्छे दिन येणार नाहीत हे निश्चित असा आरोप.

- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच त्यांचं खात बदललं. त्यांच्या जागी पियुष गोयलांना आणला. या गोयलांना काय कळतं रेल्वेचं. या गोयलांच्या पियूषपेक्षा आमच्या दादरच्या आस्वाद, प्रकाशचा पियूष बरा. 

- मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार, त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही.

- मुंबईतल्या मूठभर व गुजरातमधल्या मुठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा डाव असून हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे. 

- माझा व्यक्ती म्हणून मोदींना विरोध नाही....पण त्यांच्या भूमिकांना विरोध आहे, आधी वेगळे बोलत होते आता मोदींची भाषा बदलली आहे. तुमच्याशी आमचं घेणदेण नाही. तुमच्या चुकीच्या भूमिकांना विरोध.

- यावेळी मेट्रो परीसरातील वीज गेली, यावेळी ते म्हणाले की, वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच. 

- बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले- सुरेश प्रभूंनी बुलेटट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. फक्त २-३ माणसं देश चालवणार का?- सर्व संपादकांना माझी विनंती आहे की या सरकारला वठणीवर आणा- न्यायालयांसह सर्व संविधानिक संस्थांना माझी विनंती आहे की दबावाखाली निर्णय घेऊ नका- देशातल्या घराघराचा कानोसा घ्या या; लोकं सरकारला शिव्या घालताहेत- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत

- रतन टाटांच्या सांगण्यावरून मी गुजरातेत गेलो, परंतु आता कळतंय तो मुखवटा होता. खरा विकास झालेला नाही.

- भाजपामधले लोकपण हा सगळा खोटा मुखवटा असल्याचं खासगीत सांगतात.

- आजचा मोर्चा शांततेत निघाला, परंतु पुढचा मोर्चा शांततेत नसेल.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai Localमुंबई लोकलMNSमनसेBullet Trainबुलेट ट्रेनMNS Santap Morchaमनसे संताप मोर्चा