शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

“आज महाराज हवे होते, नराधमांचे चौरंग केले पाहिजेत”; राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:59 IST

Raj Thackeray Sabha: एकदा हातात सत्ता द्या. कायद्याची काय भीती असते. हे तुम्हाला दाखवून देतो. पोलिसांना ४८ तास दिले तर सगळा महाराष्ट्र साफ करून ठेवतील, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray Sabha: बदलापूर येथे मुलीवर अत्याचार झाला. ही घटना मनसेच्या महिला सेनेने उघडकीस आणली. तेव्हा लोकांना समजले. तोपर्यंत ती गोष्ट दाबून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराज आज हवे होते. ही महाशक्ती आता हवी होती. या नराधमांचे हातपाय कापून त्यांचे चौरंग केले पाहिजेत, या शब्दांत राज ठाकरे यांनी बदलापूर घटनेवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. यवतमाळमधील एका सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विविध मुद्द्यांवर सडेतोड शब्दांत भाष्य केले.

राज्यभरात घडणाऱ्या घटनांचा तुम्हाला राग येतो की नाही. येत असेल तर तो व्यक्त करण्याची जागा म्हणजे विधानसभा निवडणूक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही तुमचा राग मतांच्या माध्यमातून व्यक्त करायला हवा. तुम्ही जर असेच राहिलात, तर तुमच्या नशिबी अशीच माणसे येत राहणार. असेच सरकार येणार. तुमचे कुठलेही प्रश्न सुटणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. मराठवाड्याचा दौरा केला, आता विदर्भाचा दौरा करत आहे. पुढेही दौरे सुरू राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत २०० ते २५० उमेदवार उभे करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. 

राज्यात कायद्याचा वचक राहिलेला नाही, यात पोलिसांचा दोष नाही

राज्यात अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. राज्यात कायद्याचा वचक राहिलेला नाही. यासाठी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांच्यावर जो सरकारी दबाव असतो, त्या दबावामुळे पोलिसांना तसे वागावे लागते. पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की, यांचे निलंबन करणार, नोकरीवरून काढून टाकणार, यांच्या चौकशा लावणार, परंतु, जे सरकारमध्ये बसलेत, त्यांच्या चौकशा कुणी लावत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. कोणतीही गोष्ट सहज बोलत नाही, अत्यंत गांभिर्याने सांगतो आहे. एकदा राज ठाकरेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या. राज्य कारभार कसा केला जातो. कायद्याची काय भीती असते. हे तुम्हाला दाखवून देतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील मुलीकडे आणि महिलेकडे वाकड्या नजरेने कुणी पाहायची हिंमत करणार नाही. याच पोलीस यंत्रणेला सांगणार. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. या पोलिसांना ४८ दिले तर संपूर्ण महाराष्ट्र साफ करून ठेवतील. सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण अंगावर कोण घेणार, असा सवाल करत, महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. परंतु, सरकारी लोक गोलगोल उत्तरे देतात. या सगळ्या गोष्टींवर उत्तरे आहेत. महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी वणी मतदारसंघात राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करतो. सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकर यांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेbadlapurबदलापूर