शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कोकणात पावसाचे धूमशान सुरूच, मराठवाड्यात जोर कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:48 IST

जोरदार पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील अनेक धरणे भरत असली आहेत़ सोलापूर सूर्यदर्शनही होत नसल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत.

पुणे : दोन दिवसांपासून राज्यासह कोकणात पावसाचे धूमशान सुरूच असून मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे़ कोकण व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात पुराचे पाणी शिरल्याने ७० गावांचा संपर्क तुटला आहे.मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. जोरदार पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील अनेक धरणे भरत असली आहेत़ सोलापूर सूर्यदर्शनही होत नसल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत.७० गावांचा संपर्क तुटलागडचिरोली : पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडात शिरले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने छत्तीसगड सीमेकडील भामरागड तालुक्यातील जवळपास ७० गावांचा शनिवारपासून संपर्क तुटला आहे. पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.दक्षिण महाराष्टÑात संततधारकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे तर कोयना धरणाचे सहा वक्राकार दरवाजे सहा फुटांनी उचलले आहेत.>विदर्भातील ९ जिल्ह्यांत पाऊस कमीचविदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे़ संपूर्ण विदर्भाचा विचार केल्यास आतापर्यंत सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस कमी पाऊस झाला आहे़ यवतमाळ -२४, अकोला -२७, गोंदिया - २१, अमरावती -१९, गडचिरोली - १०, भंडारा -९, चंद्रपूर -८, वर्धा - ५ टक्के कमी पाऊस झाला आहे़ त्याचवेळी बुलढाणा येथे सरासरीच्या तुलनेत १२, नागपूर १० टक्के जादा पाऊस झाला आहे़ मराठवाड्यात यंदा प्रथमच सरासरीपेक्षा33%अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे़ अहमदनगरमध्ये सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १०६ टक्के पाऊस झाला आहे़मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार -३ आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा १ टक्का कमी पाऊस झाला आहे़सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : अहमदनगर १०६, औरंगाबाद ९२, सोलापूर ७२, बीड ६९, मुंबई शहर ६६, मुंबई उपनगर ६४, धुळे ६०>भंडारदरा धरण ओव्हरफ्लोअहमदनगर : भंडारदरा धरणातील पाणीसाठा रविवारी सकाळी सहा वाजता १० हजार ३३६ दशलक्ष घनफूट झाला होता. यावेळी तांत्रिकदृष्ट्या भंडारदरा धरण भरल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर धरणातून एकूण ३ हजार २६८ क्युसेकने प्रवरा नदीपात्रातपाणी सोडण्यात आले.>पावसाचा इशारा : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात १७ आॅगस्टला अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़

टॅग्स :Rainपाऊस