शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कोकणात पावसाचे धूमशान सुरूच, मराठवाड्यात जोर कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:48 IST

जोरदार पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील अनेक धरणे भरत असली आहेत़ सोलापूर सूर्यदर्शनही होत नसल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत.

पुणे : दोन दिवसांपासून राज्यासह कोकणात पावसाचे धूमशान सुरूच असून मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली आहे़ कोकण व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात पुराचे पाणी शिरल्याने ७० गावांचा संपर्क तुटला आहे.मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. जोरदार पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील अनेक धरणे भरत असली आहेत़ सोलापूर सूर्यदर्शनही होत नसल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली आहेत.७० गावांचा संपर्क तुटलागडचिरोली : पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडात शिरले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने छत्तीसगड सीमेकडील भामरागड तालुक्यातील जवळपास ७० गावांचा शनिवारपासून संपर्क तुटला आहे. पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.दक्षिण महाराष्टÑात संततधारकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे तर कोयना धरणाचे सहा वक्राकार दरवाजे सहा फुटांनी उचलले आहेत.>विदर्भातील ९ जिल्ह्यांत पाऊस कमीचविदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे़ संपूर्ण विदर्भाचा विचार केल्यास आतापर्यंत सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस कमी पाऊस झाला आहे़ यवतमाळ -२४, अकोला -२७, गोंदिया - २१, अमरावती -१९, गडचिरोली - १०, भंडारा -९, चंद्रपूर -८, वर्धा - ५ टक्के कमी पाऊस झाला आहे़ त्याचवेळी बुलढाणा येथे सरासरीच्या तुलनेत १२, नागपूर १० टक्के जादा पाऊस झाला आहे़ मराठवाड्यात यंदा प्रथमच सरासरीपेक्षा33%अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील ७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे़ अहमदनगरमध्ये सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १०६ टक्के पाऊस झाला आहे़मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार -३ आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा १ टक्का कमी पाऊस झाला आहे़सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : अहमदनगर १०६, औरंगाबाद ९२, सोलापूर ७२, बीड ६९, मुंबई शहर ६६, मुंबई उपनगर ६४, धुळे ६०>भंडारदरा धरण ओव्हरफ्लोअहमदनगर : भंडारदरा धरणातील पाणीसाठा रविवारी सकाळी सहा वाजता १० हजार ३३६ दशलक्ष घनफूट झाला होता. यावेळी तांत्रिकदृष्ट्या भंडारदरा धरण भरल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर धरणातून एकूण ३ हजार २६८ क्युसेकने प्रवरा नदीपात्रातपाणी सोडण्यात आले.>पावसाचा इशारा : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात १७ आॅगस्टला अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे़

टॅग्स :Rainपाऊस