शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

राज्यात पावसाचा जोर कायम!, बिंदूसरा, गोदावरी नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:12 IST

श्री गणरायाच्या आगमनापासून राज्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. कोकणात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येत्या गुरुवार...

पुणे : श्री गणरायाच्या आगमनापासून राज्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. कोकणात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येत्या गुरुवार (३१ आॅगस्ट) पर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बºयाच ठिकाणी पाऊस पडला़ मराठवाडाही पावसाने चिंब झाला आहे. बीड जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नेकनूर, आष्टी, अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने डोकेवाडा, बिंदूसरा मध्यम प्रकल्प भरले आहेत. डोकेवाडा, कर्जनी तलाव, ब्रह्मगाव तलावही भरले आहेत. बिंदूसरा नदीला पूर आल्यामुळे बीड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सोलापूर-धुळे राष्टÑीय महामार्गावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातून वाहतूक वळविल्याने कोंडी होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात १२४१३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू असून धरणाचा जलसाठा सोमवारी रात्री ७ वाजता ६६.८२ टक्के एवढा झाला होता.उत्तर महाराष्ट्रात नाशकात मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरीला पूर आला आहे. धरणातून रात्री सात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खान्देशातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील बोरगाव गोंडी येथील शेतकरी विठ्ठल अमृतराव गुबरे (४५) हे अंगावर वीज पडल्याने जखमी झाले.सोमवारी दिवसभरात अलिबाग ७०, रत्नागिरी ३५, डहाणू २४, पुणे ४, महाबळेश्वर ५१, मालेगाव ६, नाशिक ६, सांगली ०़५, सातारा १, सोलापूर ७, उस्मानाबाद १, परभणी २, अमरावती ११, गोंदिया ९, वर्धा २, यवतमाळ ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़नाशिक जिल्ह्यात वरुणराजाची कृपादृष्टीनाशिक : विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीपासून वरुणराजाने पुन्हा जिल्ह्णावर कृपादृष्टी केली आहे. शुक्रवारपासून सातत्याने जोरदार पाऊस जिल्ह्णाच्या काही तालुक्यांमध्ये सुरू असल्यामुळे धरणांमधून पून्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरण समूहातील डझनभर धरणांचा साठा ८०च्या पुढे सरकला आहे.शहरात संततधारेसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्णातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे जवळपास पूर्ण भरली असून विसर्ग सातत्याने सुरू आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी खोºयावरील गंगापूर धरण समूहात कश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत धरणातही चांगला पाऊस झाला आहे.पालखेड धरण समूहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. कादवा नदीवरील पालखेड धरण ७३ टक्के, करंजवण ९९ टक्के, तर कोळवण नदीवरील वाघाड १०० टक्के भरले आहे. उनंदा नदीवरील ओझरखेड १०० टक्के, पुणेगाव ९३ टक्के आणि तीसगाव धरण १०० टक्के भरले आहे. दारणा धरणात ७ हजार ११९ दलघफू इतका जलसाठा असून, धरण १०० टक्के भरले आहे. भावली धरण हे मध्यम स्वरूपाचे असून, १ हजार ४३४ दलघफू जलसाठाझाला.२९ आॅगस्ट : येत्या २४ तासात उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़३० आणि ३१आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता