शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचा जोर कायम!, बिंदूसरा, गोदावरी नदीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 05:12 IST

श्री गणरायाच्या आगमनापासून राज्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. कोकणात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येत्या गुरुवार...

पुणे : श्री गणरायाच्या आगमनापासून राज्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. कोकणात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यात बीड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. येत्या गुरुवार (३१ आॅगस्ट) पर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बºयाच ठिकाणी पाऊस पडला़ मराठवाडाही पावसाने चिंब झाला आहे. बीड जिल्ह्यात पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नेकनूर, आष्टी, अंबाजोगाई तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने डोकेवाडा, बिंदूसरा मध्यम प्रकल्प भरले आहेत. डोकेवाडा, कर्जनी तलाव, ब्रह्मगाव तलावही भरले आहेत. बिंदूसरा नदीला पूर आल्यामुळे बीड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सोलापूर-धुळे राष्टÑीय महामार्गावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातून वाहतूक वळविल्याने कोंडी होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात १२४१३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू असून धरणाचा जलसाठा सोमवारी रात्री ७ वाजता ६६.८२ टक्के एवढा झाला होता.उत्तर महाराष्ट्रात नाशकात मुसळधार पाऊस झाला. गंगापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरीला पूर आला आहे. धरणातून रात्री सात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खान्देशातही अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील बोरगाव गोंडी येथील शेतकरी विठ्ठल अमृतराव गुबरे (४५) हे अंगावर वीज पडल्याने जखमी झाले.सोमवारी दिवसभरात अलिबाग ७०, रत्नागिरी ३५, डहाणू २४, पुणे ४, महाबळेश्वर ५१, मालेगाव ६, नाशिक ६, सांगली ०़५, सातारा १, सोलापूर ७, उस्मानाबाद १, परभणी २, अमरावती ११, गोंदिया ९, वर्धा २, यवतमाळ ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़नाशिक जिल्ह्यात वरुणराजाची कृपादृष्टीनाशिक : विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीपासून वरुणराजाने पुन्हा जिल्ह्णावर कृपादृष्टी केली आहे. शुक्रवारपासून सातत्याने जोरदार पाऊस जिल्ह्णाच्या काही तालुक्यांमध्ये सुरू असल्यामुळे धरणांमधून पून्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पालखेड धरण समूहातील डझनभर धरणांचा साठा ८०च्या पुढे सरकला आहे.शहरात संततधारेसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्णातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे जवळपास पूर्ण भरली असून विसर्ग सातत्याने सुरू आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी खोºयावरील गंगापूर धरण समूहात कश्यपी, गौतमी, आळंदी हे तीन मध्यम प्रकल्पाअंतर्गत धरणातही चांगला पाऊस झाला आहे.पालखेड धरण समूहाची स्थितीही यंदा उत्तम आहे. कादवा नदीवरील पालखेड धरण ७३ टक्के, करंजवण ९९ टक्के, तर कोळवण नदीवरील वाघाड १०० टक्के भरले आहे. उनंदा नदीवरील ओझरखेड १०० टक्के, पुणेगाव ९३ टक्के आणि तीसगाव धरण १०० टक्के भरले आहे. दारणा धरणात ७ हजार ११९ दलघफू इतका जलसाठा असून, धरण १०० टक्के भरले आहे. भावली धरण हे मध्यम स्वरूपाचे असून, १ हजार ४३४ दलघफू जलसाठाझाला.२९ आॅगस्ट : येत्या २४ तासात उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार व तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़३० आणि ३१आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता