शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

दर पंधरा मिनिटांनी पावसाची नोंद घेणारी ‘आरटीडास’ यंत्रणा वापराविनाच पडून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 05:59 IST

कृष्णा खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे नियंत्रण करण्यासाठी पुण्यात बसवण्यात आलेल्या ‘आरटीडास’ (रियल टाईम डेटा अ‍ॅक्विझिशन सिस्टीम) या अत्याधुनिक यंत्रणेचा वापरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर

- अतुल कुलकर्णीमुंबई : कृष्णा खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे नियंत्रण करण्यासाठी पुण्यात बसवण्यात आलेल्या ‘आरटीडास’ (रियल टाईम डेटा अ‍ॅक्विझिशन सिस्टीम) या अत्याधुनिक यंत्रणेचा वापरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या यंत्रणेचा वापर झाला असता तर मोठी हानी टळली असती, असे या खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे.कृष्णा खो-यात सहा वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी खर्चून जवळपास ७० स्वयंचलित पर्जन्यमापक स्टेशन बसवण्यात आली आहेत. संपूर्ण कृष्णा खो-यात दर १५ मिनिटांनी होणारा पाऊस या स्टेशनच्या सहाय्याने मोजला जातो. हे पर्जन्यमापक स्टेशन्स् पुण्यात बसवलेल्या ‘आरटीडास’ यंत्रणेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पावसाची एकत्रित आणि अचूक माहिती दर पंधरा मिनिटांनी मिळू शकते. ही यंत्रणा वेधशाळेचाही अंदाज अ‍ॅटोमॅटिक घेते आणि कोणत्या धरण क्षेत्रात किती पाऊस पडणार आहे, याची नोंद करते. त्यानुसार कोणत्या भागात किती पाऊस पडणार आहे, किती पाऊस पडला आहे आणि खो-यातील सर्व मध्यम व मोठ्या धरणांमधील पाणी पातळी किती आहे, याची अचूक माहिती या यंत्रणेवर पुण्यात एका जागी बसून पहायला मिळते.एवढेच नाही तर धरणांचे दरवाजे उघडले तर त्यातून किती पाणी सोडले गेले, हे ही या यंत्रणेद्वारे कळते. ही यंत्रणा जर पाऊस सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून निरीक्षणाखाली ठेवली गेली असती, तर अनेक गोष्टी कळाल्या असत्या, नियंत्रण करता आले असते. पण याचा वापरच केला गेला नाही. विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी यात लक्ष न घातल्याने धरणातून पाणी सोडण्याचे निर्णय स्थानिक पातळीवर कनिष्ठ अधिकाºयांनी घेतले.धरणातील पाणी वेळीच सोडायला हवे होतेआपल्याकडे धरणात पाणी साठा करुन ठेवण्याची वर्षानुवर्षांची मानसिकता आहे. जमा झालेले पाणी सोडू नका यासाठी सतत राजकीय दबाव येतात हा अधिका-यांचा कायमचा अनुभव असल्याने २ आॅगस्ट रोजी या भागातील धरणांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा असतानाही अधिका-यांना ते पाणी सोडण्याची इच्छा झाली नाही.दोषी अधिका-यांवर कारवाई करू - जलसंपदामंत्रीया बाबत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, मी सगळ्या प्रकाराची माहिती घेतली आहे. दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र या भीषण पावसात परिस्थिती वेगळी होती हे ही नाकारता येणार नाही. कृष्णा खोºयात दरवर्षी २८०० ते ३००० क्युसेक्स पाऊस होतो.मात्र फक्त दोन महिन्यांत ५५०० क्युसेक्स आणि त्यातला तब्बल ३००० क्युसेक्स पाऊस फक्त दहा दिवसांत झाल्यामुळे सगळी धरणे ओव्हरफ्लो झाली. पाणी सोडण्याशिवाय पर्यायच उरला नाही.भविष्यात असे प्रसंग येऊ नयेत म्हणून डॅम आॅपरेटींग सिस्टीमला सॅटेलाईटच्या सहाय्याने जोडता येईल का? याचा तातडीने अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर