शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

दर पंधरा मिनिटांनी पावसाची नोंद घेणारी ‘आरटीडास’ यंत्रणा वापराविनाच पडून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 05:59 IST

कृष्णा खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे नियंत्रण करण्यासाठी पुण्यात बसवण्यात आलेल्या ‘आरटीडास’ (रियल टाईम डेटा अ‍ॅक्विझिशन सिस्टीम) या अत्याधुनिक यंत्रणेचा वापरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर

- अतुल कुलकर्णीमुंबई : कृष्णा खोऱ्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे नियंत्रण करण्यासाठी पुण्यात बसवण्यात आलेल्या ‘आरटीडास’ (रियल टाईम डेटा अ‍ॅक्विझिशन सिस्टीम) या अत्याधुनिक यंत्रणेचा वापरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या यंत्रणेचा वापर झाला असता तर मोठी हानी टळली असती, असे या खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे.कृष्णा खो-यात सहा वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी खर्चून जवळपास ७० स्वयंचलित पर्जन्यमापक स्टेशन बसवण्यात आली आहेत. संपूर्ण कृष्णा खो-यात दर १५ मिनिटांनी होणारा पाऊस या स्टेशनच्या सहाय्याने मोजला जातो. हे पर्जन्यमापक स्टेशन्स् पुण्यात बसवलेल्या ‘आरटीडास’ यंत्रणेशी जोडले गेले आहेत. त्यामुळे पावसाची एकत्रित आणि अचूक माहिती दर पंधरा मिनिटांनी मिळू शकते. ही यंत्रणा वेधशाळेचाही अंदाज अ‍ॅटोमॅटिक घेते आणि कोणत्या धरण क्षेत्रात किती पाऊस पडणार आहे, याची नोंद करते. त्यानुसार कोणत्या भागात किती पाऊस पडणार आहे, किती पाऊस पडला आहे आणि खो-यातील सर्व मध्यम व मोठ्या धरणांमधील पाणी पातळी किती आहे, याची अचूक माहिती या यंत्रणेवर पुण्यात एका जागी बसून पहायला मिळते.एवढेच नाही तर धरणांचे दरवाजे उघडले तर त्यातून किती पाणी सोडले गेले, हे ही या यंत्रणेद्वारे कळते. ही यंत्रणा जर पाऊस सुरु झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून निरीक्षणाखाली ठेवली गेली असती, तर अनेक गोष्टी कळाल्या असत्या, नियंत्रण करता आले असते. पण याचा वापरच केला गेला नाही. विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी यात लक्ष न घातल्याने धरणातून पाणी सोडण्याचे निर्णय स्थानिक पातळीवर कनिष्ठ अधिकाºयांनी घेतले.धरणातील पाणी वेळीच सोडायला हवे होतेआपल्याकडे धरणात पाणी साठा करुन ठेवण्याची वर्षानुवर्षांची मानसिकता आहे. जमा झालेले पाणी सोडू नका यासाठी सतत राजकीय दबाव येतात हा अधिका-यांचा कायमचा अनुभव असल्याने २ आॅगस्ट रोजी या भागातील धरणांमध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा असतानाही अधिका-यांना ते पाणी सोडण्याची इच्छा झाली नाही.दोषी अधिका-यांवर कारवाई करू - जलसंपदामंत्रीया बाबत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, मी सगळ्या प्रकाराची माहिती घेतली आहे. दोषी अधिकाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र या भीषण पावसात परिस्थिती वेगळी होती हे ही नाकारता येणार नाही. कृष्णा खोºयात दरवर्षी २८०० ते ३००० क्युसेक्स पाऊस होतो.मात्र फक्त दोन महिन्यांत ५५०० क्युसेक्स आणि त्यातला तब्बल ३००० क्युसेक्स पाऊस फक्त दहा दिवसांत झाल्यामुळे सगळी धरणे ओव्हरफ्लो झाली. पाणी सोडण्याशिवाय पर्यायच उरला नाही.भविष्यात असे प्रसंग येऊ नयेत म्हणून डॅम आॅपरेटींग सिस्टीमला सॅटेलाईटच्या सहाय्याने जोडता येईल का? याचा तातडीने अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर