शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
4
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
5
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
6
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
7
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
8
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
9
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
10
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
11
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
12
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
13
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
14
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
15
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
16
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
17
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
18
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
19
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
20
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा

राज्यातही मुसळधार; वीज पडून तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 2:44 AM

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस कोसळल्याने बळीराजा सुखावला. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, विदर्भ, मराठवाडा मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. ठाणे, पालघर आणि पनवेलसह रायगड जिल्ह्यालाही पावसाने दणका दिला. पावसामुळे वसईत तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही शनिवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीत शीळ धरण पाण्याने पूर्ण ओसंडून वाहू लागले आहे.

प. महाराष्ट्रात पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. भोगावती नदी काठोकाठ भरून वाहू लागली असून, पंचगंगेची पातळी दोन दिवसांत सात फुटांनी उचलली आहे. सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, महाबळेश्वर, नवजा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे.

कोयना धरणात ११ हजार ३०१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, कास, बामणोली भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर येथे दोन दिवसांत ११५ मिलीमीटर पाऊस झाला.मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस होत असून औरंगाबाद, लातूर, परभणीत आजही पाऊस पडला.अतिवृष्टीची नोंदगेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भात काहीठिकाणी मुसळधार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी पाऊस पडला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र