शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परतीच्या पावसाचा तडाखा! वीज पडून पाच जण ठार, खरिपातील उभी पिके जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:56 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़

मुंबई/पुणे/कोल्हापूर/अकोला: खरीप पिके हाताशी आली असताना परतीच्या पावसाने तडाखा दिला. कोकणातील भातपिके तर मराठवाडा विदर्भातील सोयाबीनसारखी खरीप पिके जमीनदोस्त केली. तर वीज कोसळून मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील दोघे जण मरण पावले तर आठ जण जखमी झाले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़ गेल्या २४ तासांत कोकणातील वेंगुर्ला ११०, देवगड १००, पेडणे ८०, महाड ७०, वैभववाडी ६०, रत्नागिरी ५० मिमी, तर मध्य महाराष्ट्रातील कर्जत १००, पन्हाळा ९०, खंडाळा बावडा ८०, बारामती, कोरेगाव ५० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत शनिवारी रात्री रविवारी झालेल्या जोरदार पावसाने भाताची पिके जमीनदोस्त झाली. सोलापूरमध्ये भरपावसात शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा शॉक बसून तो ठार झाला.मराठवाड्यात तिघांचा मृत्यूमराठवाड्यत रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठणच्या जायकवाडी धरण व परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सोडला जात आहे. माजलगाव प्रकल्पातून पाणी सोडले आहे.

टॅग्स :Rainपाऊस