शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

परतीच्या पावसाचा तडाखा! वीज पडून पाच जण ठार, खरिपातील उभी पिके जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:56 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़

मुंबई/पुणे/कोल्हापूर/अकोला: खरीप पिके हाताशी आली असताना परतीच्या पावसाने तडाखा दिला. कोकणातील भातपिके तर मराठवाडा विदर्भातील सोयाबीनसारखी खरीप पिके जमीनदोस्त केली. तर वीज कोसळून मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील दोघे जण मरण पावले तर आठ जण जखमी झाले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़ गेल्या २४ तासांत कोकणातील वेंगुर्ला ११०, देवगड १००, पेडणे ८०, महाड ७०, वैभववाडी ६०, रत्नागिरी ५० मिमी, तर मध्य महाराष्ट्रातील कर्जत १००, पन्हाळा ९०, खंडाळा बावडा ८०, बारामती, कोरेगाव ५० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत शनिवारी रात्री रविवारी झालेल्या जोरदार पावसाने भाताची पिके जमीनदोस्त झाली. सोलापूरमध्ये भरपावसात शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा शॉक बसून तो ठार झाला.मराठवाड्यात तिघांचा मृत्यूमराठवाड्यत रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठणच्या जायकवाडी धरण व परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सोडला जात आहे. माजलगाव प्रकल्पातून पाणी सोडले आहे.

टॅग्स :Rainपाऊस