शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

परतीच्या पावसाचा तडाखा! वीज पडून पाच जण ठार, खरिपातील उभी पिके जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:56 IST

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़

मुंबई/पुणे/कोल्हापूर/अकोला: खरीप पिके हाताशी आली असताना परतीच्या पावसाने तडाखा दिला. कोकणातील भातपिके तर मराठवाडा विदर्भातील सोयाबीनसारखी खरीप पिके जमीनदोस्त केली. तर वीज कोसळून मराठवाड्यातील तीन तर विदर्भातील दोघे जण मरण पावले तर आठ जण जखमी झाले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे अरबी समुद्रातील वारे बळकट झाले आहे़ त्याचा परिणाम राज्यात सर्वत्र सध्या पाऊस पडत आहे़ गेल्या २४ तासांत कोकणातील वेंगुर्ला ११०, देवगड १००, पेडणे ८०, महाड ७०, वैभववाडी ६०, रत्नागिरी ५० मिमी, तर मध्य महाराष्ट्रातील कर्जत १००, पन्हाळा ९०, खंडाळा बावडा ८०, बारामती, कोरेगाव ५० मिमी पावसाची नोंद झाली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत शनिवारी रात्री रविवारी झालेल्या जोरदार पावसाने भाताची पिके जमीनदोस्त झाली. सोलापूरमध्ये भरपावसात शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाला विजेचा शॉक बसून तो ठार झाला.मराठवाड्यात तिघांचा मृत्यूमराठवाड्यत रविवारी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये उस्मानाबाद, नांदेड, जालना, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अतिवृष्टीने हैराण केलेल्या वरुणराजाने जाता-जाताही मराठवाड्याला झोडपले. यामुळे सोयाबीन, कापूस, हळद, तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठणच्या जायकवाडी धरण व परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सोडला जात आहे. माजलगाव प्रकल्पातून पाणी सोडले आहे.

टॅग्स :Rainपाऊस