शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

विदर्भ, खान्देशात जोरधारा! हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले, गोसी खुर्दमधूनही विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 9:48 AM

नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जळगाव/नागपूर : पूर्व विदर्भ आणि खान्देशात पावसाचा जोर वाढला असून नद्यांना पूर आला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर तर विदर्भातील गोसी खूर्द, तोतलाडोह, नवेगाव खैरी ही धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिसरातील ग्रामस्थांना स्थलांतरित केले जात आहे. गडचिरोलीतही पाऊस असून, गोसीखुर्दमधून विसर्ग सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी असून संजय सरोवरचे चार दरवाजे उघडले. अमरावतीमधील तीन तालुक्यांत अतिवृष्टी असून अपर वर्धा १०० टक्के भरले आहे.