शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावसाची सुट्टी कॅन्सल; पुढील ४ ते ५ दिवस धो धो कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:30 IST

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने तडाखा दिल्यानंतर तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यभरात  ब्रेक घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बांगलादेशच्या किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा पुढील प्रवास खेपुपारच्या पूर्वेला होईल. बांगलादेशची किनारपट्टी ओलांडल्यानंतर त्या पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल ओलांडण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.मुंबईत पावसाने आता बऱ्यापैकी विश्रांती घेतली असली तरी मुंबईसाठीचा ‘यलो अलर्ट’ कायम आहे. या अलर्टनुसार, अधूनमधून येथे तुरळक सरींची शक्यता आहे. मंगळवारी मुंबईत सकाळी ८:३० वाजेपर्यंत अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ७१ टक्के एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? २ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा३ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा 

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईthaneठाणेRaigadरायगड