शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

पावसाची सुट्टी कॅन्सल; पुढील ४ ते ५ दिवस धो धो कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:30 IST

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबई : गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने तडाखा दिल्यानंतर तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यभरात  ब्रेक घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.बांगलादेशच्या किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा पुढील प्रवास खेपुपारच्या पूर्वेला होईल. बांगलादेशची किनारपट्टी ओलांडल्यानंतर त्या पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल ओलांडण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.मुंबईत पावसाने आता बऱ्यापैकी विश्रांती घेतली असली तरी मुंबईसाठीचा ‘यलो अलर्ट’ कायम आहे. या अलर्टनुसार, अधूनमधून येथे तुरळक सरींची शक्यता आहे. मंगळवारी मुंबईत सकाळी ८:३० वाजेपर्यंत अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत ७१ टक्के एवढा पाऊस नोंदविण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? २ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा३ ऑगस्ट : ऑरेंज अलर्ट : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा 

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबईthaneठाणेRaigadरायगड