शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

कोकणात पावसाचा जोर ओसरला, मराठवाड्यात भिजपाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 05:15 IST

सलग तीन दिवस मुसळधार बरसल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने कोकणवासीयांनी दिलासा मिळाला आहे.

मुंबई/पुणे : सलग तीन दिवस मुसळधार बरसल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने कोकणवासीयांनी दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर परिसरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी भिजपाऊस झाला.पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तीन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी तसेच १६ जुलैला मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़कोकणात पावसाचा जोर ओसरला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातपावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली. अधूनमधून हलक्या सरी पडत होत्या. संगमेश्वर तालुक्यात तळेकांटे येथे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात बºयापैकी पाऊस झाला. उर्वरित भागात हलक्या सरी पडल्या.नगर जिल्ह्यात भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊश झाला. घाटघर येथे २४ तासांत तब्बल सव्वा सात इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.मराठवाड्यात भिजपाऊसअर्ध्या मराठवाड्यात भिजपाऊस झाला. जालना शहरासह परतूर, मंठा आणि घनसावंगी तालुक्यात दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने कोमेजू लागलेल्या कपाशी, मका, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला आहे. बीड शहरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. वडवणी तालुक्यात दहा दिवसांनी रिमझिम पाऊस झाला. केज, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई तालुका तसेच परभणी जिल्ह्यात दिवसभर भुरभूर पाऊस होता.>शनिवारी दिवसभरात महाबळेश्वर ३९, जळगाव ६, नाशिक २, सांगली, सातारा ३, मुंबई १, सांताक्रूझ ७, अलिबाग ३, भिरा ३०,औरंगाबाद ७, बुलढाणा १९, गोंदिया येथे ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़

टॅग्स :Rainपाऊस