शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Raigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो! मुख्यमंत्र्यांचा तळीयेकरांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 07:43 IST

शनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले.

ठळक मुद्देडाेंगर उतारावरील सर्व वाड्या, वस्त्यांंचे पुनर्वसन करण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येईल.अतिवृष्टी, पुराचे पाणी, रस्ते खचणे यामुळे त्यांना घटनास्थळी पाेहोचण्यास उशीर हाेताे.पावसाचे प्रमाण आणि परिणाम काेणीच ठरवू शकत नाही. बचाव पथके जोमाने काम करीत आहेत

मुंबई : “तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीषण दरडसंकटात सापडलेल्या नागरिकांना धीर दिला.   

शनिवारी रायगडमधील तळीये या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. दरडीखाली गाडल्या गेलेल्या ढिगाऱ्यातून आता कोणी जिवंत बाहेर निघण्याची शक्यता राहिलेली नाही. घटनास्थळावर नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. त्यांचे सांत्वन करताना मुख्यमंत्र्यांनाही शब्द सुचत नव्हते.

डाेंगर उतारावरील सर्व वाड्या, वस्त्यांंचे पुनर्वसन करण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येईल. तुम्ही धीर साेडू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे. सर्वाेताेपरी मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमध्ये माणसेच काम करतात. अतिवृष्टी, पुराचे पाणी, रस्ते खचणे यामुळे त्यांना घटनास्थळी पाेहोचण्यास उशीर हाेताे. पावसाचे प्रमाण आणि परिणाम काेणीच ठरवू शकत नाही. बचाव पथके जोमाने काम करीत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

सांगली, सातारा कोल्हापूर या ठिकाणीही पूर परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल. केंद्र सरकार, लष्कर यांची मदत मिळत असल्याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

म्हाडा वसविणार नव्याने तळीये गावजवळपास संपूर्ण तळीये गाव दरडीखाली दबले आहे. परंतु, म्हाडा पुन्हा नव्याने तळीये गाव वसविणार असल्याचे राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले. गावात जेवढी घरे यात जमीनदोस्त झाली आहेत, तेवढी पक्की घरे पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षा पुन्हा देण्याची संधीमहाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागात जे विद्यार्थी २५ ते २७ जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन-२०२१ सेशन ३ परीक्षा देण्यासाठी केंद्रांवर पोहोचू शकणार नाहीत, त्यांना या परीक्षेसाठी आणखी संधी दिली जाणार आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले आहे.

कोल्हापुरात काय स्थिती?

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा.पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सक्तीने बाहेर काढले. चिखली, आंबेवाडीत अद्याप २५० जण अडकलेेत.कोल्हापुरात पाणीबाणी, नागरिकांची पाण्यासाठी धावपळ. ‘सेंट्रल किचन’मधून रोज दीड हजार पूरग्रस्तांना जेवण; कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपकडून मदतीचा हात.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaigadरायगडRainपाऊसfloodपूरlandslidesभूस्खलन