शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

रायगड जिल्ह्यास पावसाने झोडपले, भातपिके अडचणीत

By admin | Updated: August 1, 2016 16:35 IST

संततधार पावसामूळे जिल्ह्यातील प्रमुख कुंडलिका, अंबा,सावित्री,पाताळगंगा अल्हास आणि गाढी या नद्यांच्या पातळीत विक्रमी वाढ झाली

24 तासात 2528 मिमी पाऊस,  कजर्त येथे सर्वाधिक 290 मिमी पावसाची नोंद
जयंत धुळप / दि.1 (अलिबाग)
रायगड जिल्ह्यात गेल्या चोविस तासात पावसाने अगदी झोडपून काढले आहे. संततधार पावसामूळे जिल्ह्यातील प्रमुख कुंडलिका, अंबा,सावित्री,पाताळगंगा अल्हास आणि गाढी या नद्यांच्या पातळीत विक्रमी वाढ होवून नद्याची पातळी पूररेषेकडे झेपाऊ लागली असल्याने जिल्ह्यात सर्वत्र सतर्कतेचा ईशार देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीत पावसाचे पाणी भातरोपांच्या वर गेले असल्याने भातपिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात जिल्ह्यात एकुण 2528.20 मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक 290 मिमी पावसाची नोंद कजर्त येथे झाली आहे. जिल्ह्यात उवर्रित ठिका़णी रोहा-220  मि.मि.,  पनवेल -193मि.मि., म्हसळा-192 मि.मि., मुरु ड-189 मि.मि., माथेरान-170.मि.मी, तळा-168मिमी.  सुधागड पाली-158 मि.मि., पेण-155 मि.मि., श्रीवर्धन-145मि.मि., खालापूर-136 मि.मि.,पोलादपूर-123 मि.मि., महाड-122मि.मि., माणगांव-115 मि.मि., अलिबाग-94 मि.मि.  उरण-58 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. हे सरासरी पजर्न्यमान 67.75 मि.मि. आहे.
जिल्ह्यातील 70 टक्के पजर्न्यमान पूर्ण
यंदाचे सोमवारचे हे सरासरी पजर्न्यमान जिल्ह्यात 158 मिमी आहे, गतवर्षी याच दिवशी जिल्ह्याचे सरासरी पजर्न्यमान केवळ 10.84 होते. जिल्ह्यातील वार्षीक एकुण अपेक्षीत सर्वसाधारण 50 हजार 282 मिमी पावसापैकी सोमवारी सकाळी आठ वाजता 70 टक्के म्हणजे 34 हजार 933 मिमी पाऊस पूर्ण झाला आहे.
 
जिल्ह्यातील नद्यांची पातळीत झेपावू लागली पूररेषेकडे
संततधार पावसामूळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदि क्षेत्रतील कोलाड  येथे चोविस तासात 205 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी डोळवहाळ येथे 23.35 मिटर झाली आहे. कुंडलिका नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 23.95 मिटर असल्याने नदि किनारच्या परिसरात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.उल्हास नदि क्षेत्रतील  कर्जत येथे चोविस तासात 290 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी कर्जत येथे 44.60 मिटरला पोहोचली असून नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 48.77 मिटर आहे.
पाताळगंगा नदि क्षेत्रतील खालापूर  येथे चोविस तासात 136 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी लोहप येथे 19.02 मिटरला पोहोचली असून नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 21.52 मिटर आहे. अंबा नदि क्षेत्रतील  सुधागड  येथे चोविस तासात 158 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी नागोठणे येथे 7.35 मिटरला पोहोचली आहे. अंबा नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 9 मिटर आहे. सावित्री नदि क्षेत्रतील  महाड  येथे चोविस तासात 122 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी महाड येथे 4.20 मिटरला पोहोचली आहे. सावित्री नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 6.50 मिटर आहे. गाढी नदि क्षेत्रतील पनवेल  येथे चोविस तासात 193 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी पनवेल येथे 2.90 मिटरला पोहोचली असून नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 6.55 मिटर आहे.
 
72 तासांकरीता अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने वतर्विलेल्या अंदाजा नुसार येत्या 72 तासात जिल्ह्यात अति व तिव्र स्वरुपाच्या पजर्न्यवृष्टीची शक्यता असून, या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे तसेच पावसाच्या निमीत्ताने कोणतीही समस्या आल्यास आपल्या तालुक्यांच्या वा जिल्ह्याच्या आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सुत्रंनी केले आहे.