शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राहुल गांधी महाराष्ट्रात येणार, वातावरण पेटणार?; भाजपा-काँग्रेस एकमेकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 18:16 IST

मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे हा गुन्हा होत असेल तर तो आम्ही वारंवार करू असं नाना पटोले म्हणाले.

मुंबई - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या भेटीलाही राहुल गांधी येणार असल्याचे पुढे आले. त्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी मगच यावं असं म्हटलं त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला प्रतिइशारा दिला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जर भाजपावाले राहुल गांधींना चॅलेंज करत असतील. तर राहुल गांधी आता महाराष्ट्रात येणार आहेत. जर धमक असेल तर त्यांच्या केसालाही धक्का लावून पाहा, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. परंतु परंपरेला गालबोट लावायची हिंमत भाजपा करत असेल तर जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका काँग्रेसची आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी सावरकर नाही, राहुल गांधी आहे हा गुन्हा होत असेल तर तो आम्ही वारंवार करू. लोकसभेत शेतकऱ्यांना खालिस्तानी, आंदोलनजीवी असं पंतप्रधान म्हणाले. त्या नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागितली का? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला त्यांनी माफी मागितली का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरूणांच्या आत्महत्या, महागाई वाढवली, देशातील जनतेची माफी भाजपाने मागितली पाहिजे असंही त्यांनी मागणी केली. 

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?५ वेळा जाणीवपूर्वक राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला, महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तर राहुल गांधी मातोश्रीवर येतील यावर माझा विश्वास नाही. राहुल गांधी सत्ता नसताना ठाकरेंना भेटायला येतील असं वाटत नाही. मात्र यामागे काय राजकारण आहे ते शरद पवारच सांगू शकतील असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. 

संजय राऊत म्हणतात...वीर सावरकरांचे विचार वाचा, समजून घ्या आणि तुम्ही किती सावरकरांच्या विचारांचे पालन करता ते पाहा असं सांगत संजय राऊतांनी बावनकुळेंच्या इशाऱ्यावर भाष्य केले आहे. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेRahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा