शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी - कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: March 26, 2023 16:23 IST

या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे

भिवंडी - देशाला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत असतानाच राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाची बदनामी करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे अशी भूमिका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी आपल्या दिवे अंजुर येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

कपिल पाटील म्हणाले की, या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे आणि म्हणूनच देशातील ओबीसी समाजामध्ये गांधी यांच्याविरोधात प्रचंड प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष सोबतच समस्त ओबीसी समाज आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या निषेध नोंदवीत आहे.एवढे करूनही राहुल गांधी यांनी माफी मागणार नाही अशी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत मग्रुरी पणाची आहे अशी देखील मंत्री पाटील यांनी यावेळी केली.

तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांमध्ये नाही तर जगामध्ये ही स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यामुळे मोदींना बदनाम करण्याचा डाव सगळ्या विरोधी पक्षाने सुरू केलेला आहे, पण या देशातील जनता सुज्ञ असून देशाच्या जनतेला माहित आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये या देशांमध्ये नऊ वर्षांमध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आणि सामान्य नागरिकांनाही हा मुद्दा मान्य होत नाही की मोदीजींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार होईल अशा प्रकारची शंका कोणाच्याही मनामध्ये तसुभरही शंका येत नाही. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वावर देशाचा पूर्ण विश्वास आहे असंही कपिल पाटील यांनी सांगितले.  

दरम्यान, मोदी अदानी यांच्या संबंधाबाबत विचारले असता मोदींचा आणि अदानींचा काही संबंध या गोष्टी येत नाही. त्याच्यामुळे ही नागरिकांची दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न आहे त्याच्यापासून जनता निश्चितपणाने सावध आहे. जनतेला माहित आहे की देशाला पुढे कोण नेऊ शकतो, मागच्या नऊ वर्षात जे विकासाचं काम झालेलं आहे ते आपल्या नजरेसमोर आहे. देश प्रगतीपथावर आहे. आता जगामध्ये मंदी असताना भारत देश मंदीपासून सावरलेला आहे याचे एकमेव कारण काय असेल या देशाला लाभलेले मोदींचे नेतृत्व अशा शब्दात मंत्री पाटील यांनी मोदींचे कौतुक करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध या पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी