शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी - कपिल पाटील

By नितीन पंडित | Updated: March 26, 2023 16:23 IST

या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे

भिवंडी - देशाला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत असतानाच राहुल गांधी यांनी समस्त ओबीसी समाजाची बदनामी करण्याचे काम केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागितलीच पाहिजे अशी भूमिका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी आपल्या दिवे अंजुर येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

कपिल पाटील म्हणाले की, या देशात तब्बल ५२टक्के समाज ओबीसी समाज आहे, त्यांच्या वक्तव्याने ओबीसी समाजाच्या भावना दुखावण्याचा काम राहुल गांधी यांनी केला आहे आणि म्हणूनच देशातील ओबीसी समाजामध्ये गांधी यांच्याविरोधात प्रचंड प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्ष सोबतच समस्त ओबीसी समाज आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या निषेध नोंदवीत आहे.एवढे करूनही राहुल गांधी यांनी माफी मागणार नाही अशी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत मग्रुरी पणाची आहे अशी देखील मंत्री पाटील यांनी यावेळी केली.

तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांमध्ये नाही तर जगामध्ये ही स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यामुळे मोदींना बदनाम करण्याचा डाव सगळ्या विरोधी पक्षाने सुरू केलेला आहे, पण या देशातील जनता सुज्ञ असून देशाच्या जनतेला माहित आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये या देशांमध्ये नऊ वर्षांमध्ये एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आणि सामान्य नागरिकांनाही हा मुद्दा मान्य होत नाही की मोदीजींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार होईल अशा प्रकारची शंका कोणाच्याही मनामध्ये तसुभरही शंका येत नाही. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वावर देशाचा पूर्ण विश्वास आहे असंही कपिल पाटील यांनी सांगितले.  

दरम्यान, मोदी अदानी यांच्या संबंधाबाबत विचारले असता मोदींचा आणि अदानींचा काही संबंध या गोष्टी येत नाही. त्याच्यामुळे ही नागरिकांची दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न आहे त्याच्यापासून जनता निश्चितपणाने सावध आहे. जनतेला माहित आहे की देशाला पुढे कोण नेऊ शकतो, मागच्या नऊ वर्षात जे विकासाचं काम झालेलं आहे ते आपल्या नजरेसमोर आहे. देश प्रगतीपथावर आहे. आता जगामध्ये मंदी असताना भारत देश मंदीपासून सावरलेला आहे याचे एकमेव कारण काय असेल या देशाला लाभलेले मोदींचे नेतृत्व अशा शब्दात मंत्री पाटील यांनी मोदींचे कौतुक करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध या पत्रकार परिषदेत केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी