शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

राहुल गांधी स्टंटबाज, नरेंद्र मोदींशी तुलना होऊच शकत नाही; भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 14:07 IST

विकासाच्या कामावर बोलता येत नाही तेव्हा संशयास्पद, धुव्रीकरणाचं राजकारण काँग्रेसने केले असा आरोप भाजपाने केला.

मुंबई - देशातील नव्हे तर कौटुंबिक लोकशाही धोक्यात आली आहे. गांधी घराण्याशिवाय काँग्रेस राजकारण करू शकत नाही. इतके वर्ष अध्यक्ष होते. ते आम्हाला लोकशाही काय सांगतात. राहुल गांधी कधीही मोदींना चॅलेंज करू शकत नाहीत. २०२४ हा देशाचा टर्निंग पाँईट आहे. तिथे देशाची संपूर्ण जनता सगळे हेवेदावे बाजूला ठेऊन मोदींना मतदान करतील असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकासाच्या कामावर बोलता येत नाही तेव्हा संशयास्पद, धुव्रीकरणाचं राजकारण काँग्रेसने केले. भाजपा आले तर मुस्लिमांना पाकिस्तानात जावे लागेल, बाबासाहेबांची घटना बदलून टाकतील अशी दिशाभूल करून काँग्रेस मतदान मागते. आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर जातो. राहुल गांधी नरेंद्र मोदींशी तुलना होऊ शकत नाही. काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ताही मोदी हवा असं म्हणतो. देशाला मोदींची गरज आहे. जगात सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदींनी केला. त्यादिशेने पाऊले उचलली जात आहे. २०२४ च्या निवडणुकीतही मोदी हवेत असे काँग्रेसचा बुथवरचा कार्यकर्ता म्हणतो. राहुल गांधी आणि कुटुंबाने कुठले असे काम केलंय ज्याने ते मोदींशी मुकाबला करू शकतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

अदानींचा आणि सरकारचा काय संबंध?अदानी हे व्यावसायिक आहेत. ते व्यवसाय करतायेत. सरकारचा त्यांच्याशी संबंध नाही. सरकारचा त्यात थेट संबंध नाही. अदानी गुजरातचे आहेत म्हणून त्यांचा नरेंद्र मोदींशी संबंध जोडणे हे चुकीचे आहे. अंबानी, टाटा अनेकजण मोठे झालेत. उद्योगपतींशी सरकारचा संबंध काय? त्यांनी कर्ज घेतले, पैसे घेतले, व्यवसाय केला. जर उद्या बँकांना काही अडचणी आल्या तर सरकारचा संबंध येतो. हे केवळ राजकारणासाठी जोडले जातय असा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

पाहा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत

राहुल गांधी स्टंटबाजकाँग्रेसनं जे काही समज पसरवले त्याला अर्थ नाही. खासदारकी गेल्यावर बंगला सोडावा लागतो. पदावरून गेल्यानंतर बंगला खाली करण्याची नोटीस देण्याची वेळ येऊ नये. मनमोहन सिंग यांनी आणलेले विधेयक राहुल गांधींनीच फाडले होते. नवीन कायद्याने सदस्यपद रद्द झाले का? खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. नियम हा सर्वांनाच सारखा आहे. कोर्टाने शिक्षा दिली मग वरच्या कोर्टात का गेले नाहीत? तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान केला नाही तर वरच्या कोर्टात जायला हवं होते. कोर्टाच्या निकालावर स्टे मिळवला नाही तर खासदारकी जाईल हे माहिती नव्हते का? कोर्टात माफी मागितली असती तर काय बिघडले असते? ही काँग्रेसची स्टंटबाजी आहे. तुम्हाला हिरो बनायचे होते म्हणून राहुल गांधींनी खासदारकी गमावली. राहुल गांधी, जितेंद्र आव्हाड यांना स्टंटबाजी करण्याची सवय आहे असा टोलाही बावनकुळेंनी लगावला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे