शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

धनगर बांधवांनी जो भंडारा उधळला तो...; राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 16:26 IST

दुर्दैवाने आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे आहेत त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे गांभीर्य संपत चालले आहे असं विखे पाटील म्हणाले.

सोलापूर – भंडारा हा नेहमी पवित्र मानला जातो, भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली त्याचा विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी काही वावगं केले असं वाटत नाही. अचानक झालेल्या घटनेने सुरक्षा रक्षकांची जबाबदारी असते त्यांनी त्यांना पकडले. परंतु आंदोलकांवर कुठलाही गुन्हा दाखल करू नका, कारवाई करू नका अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्यात अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अचानक घडलेल्या घटनेमुळे स्वाभाविक प्रतिक्रिया होती. कार्यकर्त्यांना मी समजावेन. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मागील युती सरकारमध्येही बरेच निर्णय घेतलेत. हा आरक्षण मुद्दा कोर्टात आहे. परंतु सगळ्या सवलती धनगर समाजाला लागू केल्या आहेत. कुठल्याही सवलतीपासून धनगर समाज वंचित ठेवला नाही. महामंडळाच्या माध्यमातून धनगर समाजासाठी १० हजार कोटींच्या योजना बनवल्या आहेत. धनगर समाजाच्या विकासासाठीही सरकार पाऊल टाकतंय असं त्यांनी सांगितले.

तसेच दुर्दैवाने आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे आहेत त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे गांभीर्य संपत चालले आहे. मराठा असो, धनगर समाज असेल त्यांच्या भावनांचा आदर आहे. परंतु या समाजाच्या पाठीमागे राहून राजकीय मंडळी त्याचा गैरफायदा घेतायेत. त्याने समाजाला फायदा मिळत नाही. परंतु आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोपही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान, प्रतिकात्मक आंदोलन करताना मी त्यांचे निवेदन घेत होतो, जर मी त्यांचे निवेदन नाकारले असते, मागणीकडे दुर्लक्ष केले असते तर ठीक होते. परंतु निवेदन घेताना त्यांनी भंडारा अंगावर टाकला, अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळेच गोंधळून गेले होते. यात काही झटापट झाली. समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याला मारहाण करण्याची भूमिका नव्हती. विनाकारण काही मंडळी वाद निर्माण करतायेत त्यांनी हे करू नये असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे बांधावर जाणे हा फार्स

उद्धव ठाकरे बांधावर जाणे हा फार्स आहे, मनोरंजनासाठी ते जातात. शेतकऱ्यांना ५० हजार एकरी भाव दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं ते मुख्यमंत्री असताना म्हटले होते. तुम्ही पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढले. तुम्ही अडीच वर्षाच्या काळात काय केले? उद्धव ठाकरेंची भूमिका लोकांना माहिती आहे. त्यांना कुणी गांभीर्याने घेतील असं वाटत नाही अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलDhangar Reservationधनगर आरक्षण