शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धनगर बांधवांनी जो भंडारा उधळला तो...; राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 16:26 IST

दुर्दैवाने आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे आहेत त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे गांभीर्य संपत चालले आहे असं विखे पाटील म्हणाले.

सोलापूर – भंडारा हा नेहमी पवित्र मानला जातो, भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली त्याचा विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी काही वावगं केले असं वाटत नाही. अचानक झालेल्या घटनेने सुरक्षा रक्षकांची जबाबदारी असते त्यांनी त्यांना पकडले. परंतु आंदोलकांवर कुठलाही गुन्हा दाखल करू नका, कारवाई करू नका अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्यात अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अचानक घडलेल्या घटनेमुळे स्वाभाविक प्रतिक्रिया होती. कार्यकर्त्यांना मी समजावेन. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मागील युती सरकारमध्येही बरेच निर्णय घेतलेत. हा आरक्षण मुद्दा कोर्टात आहे. परंतु सगळ्या सवलती धनगर समाजाला लागू केल्या आहेत. कुठल्याही सवलतीपासून धनगर समाज वंचित ठेवला नाही. महामंडळाच्या माध्यमातून धनगर समाजासाठी १० हजार कोटींच्या योजना बनवल्या आहेत. धनगर समाजाच्या विकासासाठीही सरकार पाऊल टाकतंय असं त्यांनी सांगितले.

तसेच दुर्दैवाने आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे आहेत त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे गांभीर्य संपत चालले आहे. मराठा असो, धनगर समाज असेल त्यांच्या भावनांचा आदर आहे. परंतु या समाजाच्या पाठीमागे राहून राजकीय मंडळी त्याचा गैरफायदा घेतायेत. त्याने समाजाला फायदा मिळत नाही. परंतु आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोपही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान, प्रतिकात्मक आंदोलन करताना मी त्यांचे निवेदन घेत होतो, जर मी त्यांचे निवेदन नाकारले असते, मागणीकडे दुर्लक्ष केले असते तर ठीक होते. परंतु निवेदन घेताना त्यांनी भंडारा अंगावर टाकला, अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळेच गोंधळून गेले होते. यात काही झटापट झाली. समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याला मारहाण करण्याची भूमिका नव्हती. विनाकारण काही मंडळी वाद निर्माण करतायेत त्यांनी हे करू नये असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे बांधावर जाणे हा फार्स

उद्धव ठाकरे बांधावर जाणे हा फार्स आहे, मनोरंजनासाठी ते जातात. शेतकऱ्यांना ५० हजार एकरी भाव दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं ते मुख्यमंत्री असताना म्हटले होते. तुम्ही पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढले. तुम्ही अडीच वर्षाच्या काळात काय केले? उद्धव ठाकरेंची भूमिका लोकांना माहिती आहे. त्यांना कुणी गांभीर्याने घेतील असं वाटत नाही अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलDhangar Reservationधनगर आरक्षण