शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून दूध उत्पादकांची घोर फसवणूक -  राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 18:27 IST

दूध दराबाबत दिलेल्या आश्वासनांना केराची टोपली दाखवून सरकारने दूध उत्पादकांची घोर फसवणूक केली असून, दुधाला प्रती लीटर 5 रूपये अनुदान जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लावून धरली.

नागपूर : दूध दराबाबत दिलेल्या आश्वासनांना केराची टोपली दाखवून सरकारने दूध उत्पादकांची घोर फसवणूक केली असून, दुधाला प्रती लीटर 5 रूपये अनुदान जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लावून धरली.

सोमवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी राज्यातील दूध उत्पादकांच्या आंदोलनाचा विषय उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी नियम 57 व 97 अंतर्गत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. यावेळी ते म्हणाले की, दूध दराबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही. दूधदराबाबत आजवर अनेक निर्णय जाहीर झाले. पण दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी झाली नाही. सरकारने दुधाला 27 रुपये दर देण्याची घोषणा केली. पण शेतकऱ्यांना तो दरसुद्धा मिळाला नाही. अतिरिक्त दूध किंवा दुधाची भुकटी करण्यासंदर्भातही सरकारला ठोस भूमिका घेता आली नाही. दुधाच्या भुकटी निर्यातीसाठी प्रती किलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, दूध उत्पादकाला त्याचा काहीही लाभ मिळणार नाही. हा निर्णय म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका करत विखे पाटील यांनी दुधाला 30 रूपये प्रती लीटरचा दर देण्याची मागणी लावून धरली.

या सरकारवर शेतकऱ्यांना अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता हे सरकार बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याच्या धमक्या देते आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर शेतकऱ्यांसोबत असल्याचे सरकारने ध्यानात ठेवावे, असा सूचक इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. त्यानंतर सरकारची उदासीनता आणि दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या आमदारांनी दूध उत्पादकांच्या समर्थनार्थ आज विधानभवन परिसरात जोरदार निदर्शने केली. विखे पाटील यांच्यासह विरोधी पक्षांच्या आमदारांनी यावेळी घंटानाद करून दूध उत्पादकांच्या समस्यांबाबत सरकारच्या अनास्थेचा प्रतिकात्मक निषेध नोंदवला. दूध दरवाढीच्या प्रश्नावर शिवसेना गप्प का आहे? ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी दूध उत्पादकांसोबत असल्याची नौटंकी करण्याऐवजी निर्णय घेऊन शेतकऱ्यांप्रती आपली प्रामाणिकता सिद्ध करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८