शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:41 IST

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी.

अहमदनगर - काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी. काँग्रेस पक्षात आता चिंतन करण्याचा सुध्दा विषय संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. माजी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावरही विखे यांनी टीका केली.  निळवंडे कालव्यांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पक्षविरहीत संघर्ष केला. त्याचे हे यश आहे. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनी जिरायती भागातील पाणी प्रश्नांबाबत मांडलेली भूमिका प्रत्यक्षात उतरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने बोलावलेल्या बैठकीत झालेले निर्णय महत्वपूर्ण आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केलेले सहकार्य आणि ज्येष्ठ नेते माजीमंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हे यश आहे, असेही विखे म्हणाले.भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकीलोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी? याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही राधाकृष्ण विखे म्हणाले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा