शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांमुळेच काँग्रेसची अधोगती, राधाकृष्ण विखेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:41 IST

काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी.

अहमदनगर - काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य नेत्यांमुळेच पक्षाची अधोगती झाली. या नेत्यांनी आता बाजूला होऊन नव्यांना संधी द्यावी. काँग्रेस पक्षात आता चिंतन करण्याचा सुध्दा विषय संपला असल्याची टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी संगमनेरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. माजी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावरही विखे यांनी टीका केली.  निळवंडे कालव्यांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पक्षविरहीत संघर्ष केला. त्याचे हे यश आहे. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनी जिरायती भागातील पाणी प्रश्नांबाबत मांडलेली भूमिका प्रत्यक्षात उतरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने बोलावलेल्या बैठकीत झालेले निर्णय महत्वपूर्ण आहेत. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केलेले सहकार्य आणि ज्येष्ठ नेते माजीमंत्री मधुकर पिचड यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हे यश आहे, असेही विखे म्हणाले.भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकीलोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचे समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी? याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही राधाकृष्ण विखे म्हणाले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा