महाड-पंढरपूर रस्त्यावर राडारोडा
By Admin | Updated: June 30, 2016 01:48 IST2016-06-30T01:48:54+5:302016-06-30T01:48:54+5:30
महाड-पंढरपूर रस्त्यावरील साईडपट्ट्यांना मातीमिश्रीत मुरुम टाकल्याने पावसाच्या पाण्यामुळे माती खचली असून रस्त्यावर राडारोडा झाला आहे.

महाड-पंढरपूर रस्त्यावर राडारोडा
भोर : महाड-पंढरपूर रस्त्यावरील साईडपट्ट्यांना मातीमिश्रीत मुरुम टाकल्याने पावसाच्या पाण्यामुळे माती खचली असून रस्त्यावर राडारोडा झाला आहे. दुचाकी पडत आहेत, तर चारचाकी रुतून बसत आहेत.
तीन-चार दिवसांपासून हे प्रकार सुरू आहे.सार्वजनिक बांधकाम विभा गाकडून माती बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या रस्तावर तीन-चार महिन्यांपूर्वी देवघर ते वरंध घाटापर्र्यंतच्या रस्त्यांच्या साईडपट्ट्या खोलवर गेल्यामुळे वाहतुकीस अडचण येत असल्यामुळे त्यात मुरुम भरण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी सुमारे १५ ते २० लाख खर्चही केला होता. मात्र माती-मुरुममिश्रित टाकल्याने रस्त्यावर चिखलाचा राडारोडा झाला आहे. वेणुपुरी गावाजवळचा एक किलोमीटरचा रस्ता नादुरुस्त आहे.
>१५ लाख रुपये पाण्यात
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यासाठी १५ ते २० लाखांचा खर्च करण्यात आला होता. मात्र निकृष्ट काम केल्याने टाकलेली माती पाण्यात वाहून गेली आहे. शासनाचे पैसेही वाया गेले असून प्रवाशांनाही मनस्ताप होत आहे, असे नीरा-देवघर धरणग्रस्त पुनर्वसन विकास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासोा मालुसरे यांनी सांगितले.
वाहतूक ठप्प
रविवारपासून महाड-पंढरपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडवरून भोरला येणाऱ्या गाड्या धारमंडप शिळींब पांगारी-पसुरेमार्गे भोरला येत आहेत. इतर आगाराच्या एसटी बस ताम्हणी घाटमार्गे (मुळशी) मधून येत आहेत. शाळा, कॉलेजातील मुलांना दोन दिवसांपासून शाळेत जाता येत नाही, तर अनेकांना कामावरही जाता आले नसल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असल्याचे हिर्डोशीचे उपसरपंच विजय धामुणसे व संदीप धामुणसे यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी जे. सी. बी. व ट्रॅक्टरच्या मदतीने चिखल काढण्याचे काम करीत आहेत. सोमवारी रस्ता वाहतुकीस खुला होणार होता, मात्र अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने महाड-पंढरपूर रोडवरील वाहतूक ठप्पच आहे. दोन दिवसांत रस्ता वाहतुकीस खुला होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.