शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

R. R. Patil: मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? आर. आर. पाटील यांच्या लेकीची भावूक पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 10:33 IST

R. R. Patil News: २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आर. आर. पाटील यांनी केलेला गावाचा शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत आबांची लेक Smita R R Patil यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

मुंबई - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाची आठवण आजही काढली जाते. आबांनी मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे दाखले आजही दिले जातात. फेब्रुवारी २०१५ रोजी आर. आर. पाटील यांचे आजारपणामुळे अकाली निधन झाले होते. दरम्यान, २०१४च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आर. आर. पाटील यांनी केलेला गावाचा शेवटचा दौरा आणि त्यांच्या अखेरच्या दिवसांबाबत आबांची लेक स्मिता पाटील यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

पप्पांचा शेवटचा दिवस! असे शिर्षक देऊन स्मिता पाटील यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यात त्या म्हणतात की, आज ८ नोव्हेंबर. बरोबर ७ वर्षे झाली माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय, असे पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.

३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. त्यानंतर ६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळं गाव त्यांनी दोन-दोनदा फिरून पाहिले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत. त्याचप्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे पाहून जात असत. पण त्यादिवशी मात्र पप्पा जाताना लोकांमधून वेळ काढून मी आणि माझी बहिण सुप्रिया हिला भेटण्यासाठी आमच्या रूममध्ये आले. पप्पांनी त्यादिवशी वर येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली. त्याक्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही दोघी बहिणीही विचार करू लागलो की,  पप्पांना काय वाटले असावे, की पप्पांनी मिठ्ठी मारली आणि पप्पांच्या डोळ्यात का पाणी आले असावे? पण आम्हाला वाटलेही नव्हते की, आज पप्पांनी आम्हाला शेवट चे कुशीत घेतले आहे, अशी आठवण स्मिता पाटील यांनी जागवली.

त्यांनी पुढे लिहिले की, त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारुती-शंकराचेही न चुकता दर्शन घेतले होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा! आता आणखी किती सत्कार करणार? कदाचित मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? असा भावूक प्रश्न स्मिता पाटील यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFamilyपरिवार