शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 12:42 IST

जरांगे पाटील यांना मविआ नेत्यांकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत लिहून घ्यावं, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसले असून यामुळे राज्य सरकारची कोंडी झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना मविआ नेत्यांकडून ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत लिहून घ्यावं, असं आवाहन केलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षणावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मनोज जरांगे पाटील यांनी मी आवाहन केलं आहे की, तुम्हाला जर महाविकास आघाडीतील तीन पक्षांनाच मदत करायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्यायला पाहिजे की सत्तेत आल्यास आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ. मविआतील पक्षांनी असं लिहून दिलं तर जरांगे पाटलांनी त्यांना मदत करावी. कालच शेवटी शरद पवारांनी सांगितलं की जरांगेंची मागणी तर योग्य आहे, आरक्षण मिळालं पाहिजे, पण इतरांचं कमी करू नका. म्हणजे शेवटी शरद पवारांची दुटप्पी भूमिका समोर आलीच. त्यामुळे आता आपल्यासमोर प्रश्न एवढाच आहे की या लोकांना एक्स्पोज केलं पाहिजे. हे जेवढे दुटप्पी भूमिका घेतात ते लोकांसमोर मांडलं पाहिजे," असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, "राज्य सरकारने जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली होती तेव्हा स्वत: शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी संयुक्त निवेदनावर सही केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, असं त्या निवेदनात म्हटलं आहे. शरद पवार आणि अन्य नेत्यांच्या सहीचा कागद आपल्याकडे आहे," असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला.

मराठा आरक्षणावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय?

मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारला असता रत्नागिरी इथं बोलताना नुकतंच शरद पवार म्हणाले की, "मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचं एक वैशिष्ट्ये होतं की, हा समाज इतर जाती-जमातींना सोबत घेऊन जाणारा आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितलं तरी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभा करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला आहे आणि तीच भावना आजही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. विशेषत: जरांगे पाटील यांनी स्वत:ही अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितलं की धनगर, मुस्लीम, लिंगायत अशा इतर समाजालाही आरक्षण मिळावं. त्यामुळे सर्व लहान घटकांना सोबत घ्यावं, असं आमचं म्हणणं आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलSharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षण