शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

संघटक माणसं जोडतो, तोडत नाही; लक्ष्मण मानेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 17:55 IST

प्रकाश आंबेडकरांकडून लोकांच्या भावनेची कदर केली जात नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही मनुष्य राहणार नाही, असं सांगताना माने यांनी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठपली असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. मुस्लीम आणि दलित मतांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात अनोखा प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आंबेडकरांच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांचे पूर्वीचे सहकारी लक्ष्मण माने यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रकाश आंबेडकर राज्याच्या राजकारणात नवीन आघाडी उदयाला आणतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, आंबेडकरांच्या या इराद्याला विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरंग लागल्याचे चित्र आहे. लोकसभेला सोबत लढलेल्या एमआयएमने वंचितपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्य केले.

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून लोक प्रकाश आंबेडकरांकडे सद्भावनेने पाहतात. परंतु, ते लोकांची सद्भावना समजून घेत नाहीत. लोकशाहीत संघटकाचे काम माणसं जोडून संघटन मजबूत करण्याचे असते. माणस तोडून राजकारण शक्य नाही. मात्र प्रकाश आंबेडकरांकडून माणसं तोडली जातात. ते सहकाऱ्यांसोबत विश्वासाने राहात नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही स्वाभिमानी मनुष्य राहणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकरांचे जुने सहकारी आणि महाराष्ट्र बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून लोकांच्या भावनेची कदर केली जात नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही मनुष्य राहणार नाही, असं सांगताना माने यांनी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.