शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
4
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
5
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
6
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
7
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
8
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
9
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
10
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
11
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
12
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
13
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
14
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
15
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
16
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
17
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
18
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
19
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
20
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश

संघटक माणसं जोडतो, तोडत नाही; लक्ष्मण मानेंची प्रकाश आंबेडकरांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 17:55 IST

प्रकाश आंबेडकरांकडून लोकांच्या भावनेची कदर केली जात नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही मनुष्य राहणार नाही, असं सांगताना माने यांनी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठपली असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. मुस्लीम आणि दलित मतांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात अनोखा प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आंबेडकरांच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांचे पूर्वीचे सहकारी लक्ष्मण माने यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रकाश आंबेडकर राज्याच्या राजकारणात नवीन आघाडी उदयाला आणतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, आंबेडकरांच्या या इराद्याला विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुरंग लागल्याचे चित्र आहे. लोकसभेला सोबत लढलेल्या एमआयएमने वंचितपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष्य केले.

बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून लोक प्रकाश आंबेडकरांकडे सद्भावनेने पाहतात. परंतु, ते लोकांची सद्भावना समजून घेत नाहीत. लोकशाहीत संघटकाचे काम माणसं जोडून संघटन मजबूत करण्याचे असते. माणस तोडून राजकारण शक्य नाही. मात्र प्रकाश आंबेडकरांकडून माणसं तोडली जातात. ते सहकाऱ्यांसोबत विश्वासाने राहात नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही स्वाभिमानी मनुष्य राहणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकरांचे जुने सहकारी आणि महाराष्ट्र बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून लोकांच्या भावनेची कदर केली जात नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही मनुष्य राहणार नाही, असं सांगताना माने यांनी आपण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.