शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:06 IST

एमपीएससीतर्फे २०१७ च्या राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिध्द केला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या लांबलेल्या नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. पुढील सात दिवसांत उपजिल्हाधिकारी, डी.वाय.एस.पी.,तहसीलदार आदी महत्त्वाच्या पदांचे नियुक्तीपत्र संबंधित पात्र उमेदवारांना दिले जाईल, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एमपीएससीतर्फे २०१७ चा मुख्य परीक्षेचा समांतर आरक्षणावरील सुधारित निकाल प्रसिध्द केला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.एमपीएससीतर्फे २०१७ मध्ये राज्य सेवेच्या सुमारे ४५० पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार होते. परंतु, एमपीएससीच्या निकालावर आक्षेप घेवून आरक्षित प्रवर्गाच्या महिला उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आरक्षित प्रवर्गातील महिला उमेदवार खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतात हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे एमपीएससीकडून सुधारित निकाल जाहिर करणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे वर्षभरापासून एमपीएससीकडून यावर निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे पात्र उमेदवारांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमपीएससीकडून सुधारित निकाल जाहीर केला. एमपीएससीतर्फे सुधारित निकाल प्रसिध्द केल्यामुळे रखडलेल्या नियुक्तीचा प्रश्नही मार्गी लागला आहे.---एमपीएससीतर्फे २०१७ च्या राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिध्द केला आहे. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना लवकरच संबंधित विभागाकडून नियुक्ती पत्र दिले जाईल. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या सात दिवसात पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल.- चंद्रशेखर ओक, अध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोग

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीjobनोकरीGovernmentसरकार