शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

"प्रत्येक गोष्टीला मतांच्या..."; न्यायासाठी लढतोय म्हणणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:30 IST

पुणे अपघात प्रकरणात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरलं होतं.

Pune porsche accident : पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मद्यप्राशन करुन अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाची देशपातळीवर देखील दखल घेतली जात आहे. दुसरीकडे या प्रकरणावरुन राजकारण देखील सुरु झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेविषयी रोष व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. तर या प्रत्युत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी हे मतांचे राजकारण करत आहेत, असं म्हटलं आहे.

रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत दोघांना उडवले होते. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर काहीवेळात जामीन मिळाला. कोर्टाने जामीन देताना काही अटी ठेवल्या होत्या. त्यावरुन लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका देखील केली. राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत मोदींना दोन भारत हवे आहेत म्हणत सरकारला घेरलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"या घटनेचे राजकारण करण्याचा हा चुकीचा प्रकार आहे. कारण पुण्यातील घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयावरही आम्ही आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र पोलिसांनी त्याविरोधात अपील दाखल केले आहे. अल्पवयीन मुलाला दारू पाजणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच गाडी देणाऱ्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. राहुल गांधींनी प्रत्येक गोष्टीत मतांचे राजकारण आणण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. मी त्याचा निषेध करतो. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

"दोघांचा बळी गेल्यानंतर तु्म्ही श्रीमंत घरातील मुलाकडून निबंध लिहून घेता म्हणत राहुल गांधींची पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असे राहुल गांधींनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस