शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक गोष्टीला मतांच्या..."; न्यायासाठी लढतोय म्हणणाऱ्या राहुल गांधींना फडणवीसांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 14:30 IST

पुणे अपघात प्रकरणात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरलं होतं.

Pune porsche accident : पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मद्यप्राशन करुन अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत दोघांना धडक दिली होती. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाची देशपातळीवर देखील दखल घेतली जात आहे. दुसरीकडे या प्रकरणावरुन राजकारण देखील सुरु झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेविषयी रोष व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. तर या प्रत्युत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी हे मतांचे राजकारण करत आहेत, असं म्हटलं आहे.

रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत दोघांना उडवले होते. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर काहीवेळात जामीन मिळाला. कोर्टाने जामीन देताना काही अटी ठेवल्या होत्या. त्यावरुन लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका देखील केली. राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त करत मोदींना दोन भारत हवे आहेत म्हणत सरकारला घेरलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"या घटनेचे राजकारण करण्याचा हा चुकीचा प्रकार आहे. कारण पुण्यातील घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणी बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयावरही आम्ही आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र पोलिसांनी त्याविरोधात अपील दाखल केले आहे. अल्पवयीन मुलाला दारू पाजणाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच गाडी देणाऱ्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. राहुल गांधींनी प्रत्येक गोष्टीत मतांचे राजकारण आणण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. मी त्याचा निषेध करतो. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं योग्य नाही," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

"दोघांचा बळी गेल्यानंतर तु्म्ही श्रीमंत घरातील मुलाकडून निबंध लिहून घेता म्हणत राहुल गांधींची पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा," असे राहुल गांधींनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस