शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 20:58 IST

कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला असं मनसेचे किशोर शिंदेंनी म्हटलं.

मुंबई - राज्यात सरकार बदलल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेत. हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे असं सातत्याने सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुण्यातील मनसेचे किशोर शिंदे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. गणेशोत्सवात अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली असा आरोप शिंदे यांनी केला आहे. 

किशोर शिंदे म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला. गेल्या २० वर्षापासून संगम तरूण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रसंगावर चलचित्र देखावा आयोजित करतो. जेणेकरून लहान मुलांना इतिहास समजावा. यंदा अफझल खानाचा वध दाखवायचा होता. खानाने देऊळं तोडली. शेर शिवराज सिनेमात हे सगळं दाखवलं आहे. अफझल खान देवमाणूस आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच हिंदुत्ववादी विचारांनी हे सरकार आले आहे. त्यामुळे सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. गणेशोत्सवात अफझल खानाचा वध दाखवण्यास कसला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आहे. मनसे आमदार राजू पाटील हेदेखील गृहमंत्र्यांशी बोलणार आहेत. उद्या याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत अशीही माहिती मनसे नेते किशोर शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगून पोलीस चालढकल करत आहेत. सांगलीत कधीकाळी दंगल घडली होती. महाराजांचा इतिहास लपवता येणार नाही. महाराजांचा इतिहास आम्ही दाखवणार आहोत. १०० टक्के लोकांना इतिहास दाखवणार आहोत. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही चालतील असंही मनसेचे किशोर शिंदे यांनी सांगितले आहे. 

मनसेचा हिंदुत्ववादी बाणा मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्ववादी विचारांचा आवाज बुलंद करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा मुद्दा पुढे आणला. पोलिसांनी अनधिकृत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असं राज यांनी म्हटलं. त्यानंतर भाजपानेही राज ठाकरेंच्या मागणीला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे सरकार हिंदुत्वविरोधी आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्यात बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी विचार पुढे नेणार असं म्हटलं होतं. त्यामुळे आता मनसेने केलेल्या आरोपावर सरकार आणि गृहमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचे आहे.  

टॅग्स :MNSमनसेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEknath Shindeएकनाथ शिंदेHinduहिंदू