शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

अफझल खान वधाचा देखावा दाखवायला पोलिसांनी परवानगी नाकारली; मनसेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 20:58 IST

कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला असं मनसेचे किशोर शिंदेंनी म्हटलं.

मुंबई - राज्यात सरकार बदलल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झालेत. हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे असं सातत्याने सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र पुण्यातील मनसेचे किशोर शिंदे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. गणेशोत्सवात अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवायला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली असा आरोप शिंदे यांनी केला आहे. 

किशोर शिंदे म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अफझल खानच्या वधाचा देखावा दाखवण्यात नकार दिला. गेल्या २० वर्षापासून संगम तरूण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रसंगावर चलचित्र देखावा आयोजित करतो. जेणेकरून लहान मुलांना इतिहास समजावा. यंदा अफझल खानाचा वध दाखवायचा होता. खानाने देऊळं तोडली. शेर शिवराज सिनेमात हे सगळं दाखवलं आहे. अफझल खान देवमाणूस आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच हिंदुत्ववादी विचारांनी हे सरकार आले आहे. त्यामुळे सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. गणेशोत्सवात अफझल खानाचा वध दाखवण्यास कसला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आहे. मनसे आमदार राजू पाटील हेदेखील गृहमंत्र्यांशी बोलणार आहेत. उद्या याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत अशीही माहिती मनसे नेते किशोर शिंदे यांनी दिली. 

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगून पोलीस चालढकल करत आहेत. सांगलीत कधीकाळी दंगल घडली होती. महाराजांचा इतिहास लपवता येणार नाही. महाराजांचा इतिहास आम्ही दाखवणार आहोत. १०० टक्के लोकांना इतिहास दाखवणार आहोत. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही चालतील असंही मनसेचे किशोर शिंदे यांनी सांगितले आहे. 

मनसेचा हिंदुत्ववादी बाणा मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्ववादी विचारांचा आवाज बुलंद करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा मुद्दा पुढे आणला. पोलिसांनी अनधिकृत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असं राज यांनी म्हटलं. त्यानंतर भाजपानेही राज ठाकरेंच्या मागणीला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे सरकार हिंदुत्वविरोधी आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राज्यात बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्ववादी विचार पुढे नेणार असं म्हटलं होतं. त्यामुळे आता मनसेने केलेल्या आरोपावर सरकार आणि गृहमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचे आहे.  

टॅग्स :MNSमनसेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजEknath Shindeएकनाथ शिंदेHinduहिंदू