शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:45 IST

Pune Accident Case: या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही मान्य करावं लागेल, असा टोला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी लगावला. 

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना  सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या घटनेवरून गृहमंत्रालयाच्या कारभाराचे वाभाडे काढत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. सगळंच जर मी करायचं असेल, तर मी पुन्हा म्हणेन की गृहखातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं. आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सीडीआर वगैरे तपासणं ही गृहखात्याची जबाबदारी आहे. बाकी सगळंच जर मी करायचं असेल, तर मी पुन्हा म्हणेन की गृहखातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते, असं आव्हान सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, संजय राठोड कॅबिनेटमंत्री असताना जेव्हा आरोप झाले, तेव्हा संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. तसेच अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची केवळ ऐकीव माहिती आणि परमबीर सिंह यांनी केलेले आरोप, जे आरोप सिद्धही झालेले नव्हते, तरीही त्यांना कोठडीत टाकलं गेलं. पण आम्ही आता आहेराची यादीच वाचली, पण आता काय कारवाई झाली? आम्ही आरोप करून ४८ तास झाले. या ४८ तासांमध्ये शंभुराज देसाई यांचं कुठलं अधिकृत वक्तव्य आलंय. का ते या आरोपांवर अधिकृत वक्तव्य करत नाहीत. भाजपाला भ्रष्टाचार आणि वसुलीची चिड आहे ना, मग यावर गृहमंत्र्यांचं अधिकृत वक्तव्य का येत नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

अपघात तसे अनेक होतात. मात्र या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य करावं लागेल, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSushma Andhareसुषमा अंधारेPuneपुणेAccidentअपघात