लागला टकळा पंढरीचा!
By Admin | Updated: June 20, 2014 22:38 IST2014-06-20T22:38:46+5:302014-06-20T22:38:46+5:30
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या (शनिवारी) सकाळी सहाला आजोळघरातून पंढरीकडे प्रस्थान होईल.

लागला टकळा पंढरीचा!
>शेलपिंपळगाव / आळंदी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे उद्या (शनिवारी) सकाळी सहाला आजोळघरातून पंढरीकडे प्रस्थान होईल. प्रस्थानापूर्वी शनिवारी पहाटे एक वाजता माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात येणार असून, नंतर पंचामृत पूजा, पंचपक्वान्न नैवेद्य, आरती व पसायदान घेतले जाणार आहे.
ज्ञानेश्वरमहाराजांचा आषाढी पायीवारी पालखी प्रस्थान सोहळा लाखो वैष्णवांसह आजपासून पंढरीच्या वाटेवर निघणार आहे. रात्नी उशिरा आजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यातील माऊलींच्या पादुकांचे लाखो वारक:यांनी अगदी सहज व सुलभ दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनसाठी रात्नीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धन्य आज संत दशर्नाचा !
अनंत जन्मीचा शीण गेला !!
मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे !
कदा न सोडावे चरण त्यांचे !!
अशीच भावना प्रत्येक वारक:यांमध्ये दिसत होती. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली आहे. वारक:यांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरकारांचा माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखविला जाईल. पावणोसहाच्या दरम्यान शितोळे सरकारांचे अश्व आजोळघरी आणले जाणार असून, गांधीवाडय़ात त्यांना मानपान दिले जाईल. त्यानंतर माऊलींची पालखी आळंदी ग्रामस्थ व मानकरी खांद्यावर घेऊन नगरपालिकेसमोर सजविलेल्या रथात विराजमान करतील. वाजतगाजत पालखी सोहळा पुढे धाकटय़ा पादुका व नंतर साई मंदिरासमोर थोरल्या पादुकांशेजारी जाऊन विसावा घेईल. या ठिकाणी देवाची आरती होईल. आरतीनंतर पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल. नवमी व दशमीला हा सोहळा पुण्यात भवानी पेठेत, तर एकादशीला सासवड या ठिकाणी मुक्काम करेल.
माऊलींचे आजोळघर..
माऊलींचे आजोळघर पूर्वी गोसावी यांचा वाडा होता. त्यांच्याकडून हा वाडा श्रीपाद गांधी यांनी खरेदी केला. पूर्वी पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वैद्य नवमीला होत असे; परंतु कधी कधी सलग दोन नवम्या येत असल्याने सोहळा प्रस्थानानंतर माउलींची पालखी ठेवायची कोठे? असा पेच निर्माण होई. हा पेच सोडविण्यासाठी माऊलींची पालखी मंदिराशेजारील गांधीवाडय़ात ठेवण्यात येऊ लागली. पुढे हीच प्रथा रूढ झाली. कालांतराने याच वाडय़ाला ‘माऊलींचे आजोळघर’ संबोधले जाऊ लागले. गांधीवाडय़ात माऊली आल्यानंतर त्यांच्या सर्व सेवेचा मान याच घरण्याकडे देण्यात आला. आजही ही परंपरा सुरू आहे.