शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

अपघातात भाऊ गमावलेल्या तरुणाची हायवेवर जनजागृती

By admin | Updated: July 16, 2016 21:03 IST

भाऊ गमावल्याचे दु:ख बाजूला ठेवून इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वोदय भांडार येथे कामास असलेल्या राजेश थिटे नामक छोट्या भावाने दिवसभर रोडवर थांबून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे

विलास जळकोटकर/ऑनलाइन लोकमत -
सोलापूर, दि. 16 - शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच जोडीला शहराला लागून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे; मात्र हे करताना शहरानजीकच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवल्याने शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न करणा-यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारातून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. भाऊ गमावल्याचे दु:ख बाजूला ठेवून इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वोदय भांडार येथे कामास असलेल्या राजेश थिटे नामक छोट्या भावाने दिवसभर रोडवर थांबून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. 
 
४ जुलै रोजी मुलाच्या बारशाची तारीख काढण्यासाठी सोलापूर शहरात गेलेला सुहास ज्ञानदेव थिटे हा तरुण दुचाकीवरुन आपल्या आईसमवेत पुणे नाका हायवेपास करुन जात असताना एकेरी पुलाजवळ समोरुन येणा-या वाहनाने धडक दिल्याने मरण पावला. त्याच्या अकाली जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर आघात झाला. सव्वा महिन्याचे बाळ पित्याच्या छत्रापासून मुकले गेले. अशा घटना या हायवेवर वारंवार घडत आहेत. केवळ सर्व्हिस रोड नसल्याने वाहनधारक दूरवर जाऊन परत वळण्यापेक्षा शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात असे प्रकार घडू लागले आहेत. 
 
मयत झालेल्या सुहासचा छोटा भाऊ राजेश थिटे यांनी आपल्या भावावर ओढावलेला हा प्रकार इतरांवर ओढावला जाऊ नये यासाठी पुणे नाका राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत फलकाद्वारे अपघात टाळण्यासाठी  जनजागृतीचे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. शॉर्टकट जाणा-या वाहनधारकांना थांबवून आपल्या भावाच्या अपघाताची माहिती देऊन त्यांना नियमबाह्य वाहतुकीपासून परावृत्त करतो आहे. 
 
एका तरुणाने दाखवलेली ही कळकळ समजून घेऊन वाहनधारकांनीही आपला अनमोल जीव वाचवण्यासाठी जागरुक राहण्याची गरज आहे. आणि प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी. यामुळे या भागातील विस्तारलेल्या हजारो लोकांची गैरसोय दूर होणार असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
... तर अपघाताची संख्या वाढत जाईल
मरण पावलेला सुहास मधला, मोठा भाऊ आनंद आणि सर्वात लहान राजेश थिटे हे कुटुंबीय मडकी वस्ती परिसरातील ग्रीन अपार्टमेंटमध्ये राहतात. भावाच्या अकाली जाण्याने हे कुटुंबीय खचले आहेत. असे प्रकार वारंवार घडू नयेत यासाठी पुणे नाका ते बाळे मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना घडून अपघातातून बळी आणि जखमींची संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती राजेश थिटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.