खेडय़ांमध्ये अत्याधुनिक सुविधा पोहोचवा
By Admin | Updated: September 16, 2014 00:39 IST2014-09-16T00:39:16+5:302014-09-16T00:39:16+5:30
शेती, ऑटोमोबाईल, तंत्नज्ञान क्षेत्नातील चांगल्या गोष्टी अद्यापही ग्रामीण भारतात पोहोचलेल्या नाहीत. वीज, रस्ते, पाणी, इंटरनेट जोडणीची सुविधा मिळालेली नाही.

खेडय़ांमध्ये अत्याधुनिक सुविधा पोहोचवा
पुणो : शेती, ऑटोमोबाईल, तंत्नज्ञान क्षेत्नातील चांगल्या गोष्टी अद्यापही ग्रामीण भारतात पोहोचलेल्या नाहीत. वीज, रस्ते, पाणी, इंटरनेट जोडणीची सुविधा मिळालेली नाही. त्यामुळे शहरी भागात सहज उपलब्ध होत असलेल्या अत्याधुनिक सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली.
अभियंता दिनानिमित्त दिघी येथील आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एआयटी) आयोजित व्याख्यानात ‘तंत्नज्ञान आणि त्याचे अभिसरण’ या विषयावर डॉ. कलाम बोलत होते. या वेळी ‘एआयटी’चे अध्यक्ष मेजर जनरल राजीव सबरवाल, संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) एस. के. लाहिरी, प्राचार्य डॉ. व्ही. पी. गोसावी, माहिती तंत्नज्ञान विभागाच्या प्रमुख संगीता जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. कलाम म्हणाले, ‘‘पारदर्शी, गुरूकडून पावित्र्याचे शिक्षण मिळत असल्याचे तो महत्त्वाचा घटक असतो. मात्न, आजच्या काळात पावित्न ही मोठी समस्या आहे. त्याकडे शिक्षकांनीही गांभीर्याने पाहायला हवे. अपयशाने खचून न जाता त्यातून प्रेरणा घेत पुढे जाण्याचा प्रय} विद्याथ्र्यानी करावा. आंतरशाखांचा मेळ साधत देशाच्या स्थिर विकासात भर घालावी. भ्रष्टाचारमुक्त राष्ट्रासाठी युवापिढीने काम करणो गरजेचे आहे. त्यासाठी विद्याथ्र्यानी तंत्नज्ञानाच्या विविध शाखांच्या अभिसरणातून अभ्यास करावा. तसेच सर्जनशीलता, नावीन्य, सर्वोत्तम कामगिरीचा ध्यास घ्यावा.’’
विद्याथ्र्यानीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून डॉ. कलाम यांच्याशी थेट संवाद साधला. विद्याथ्र्याच्या प्रश्नांना दाद देत डॉ. कलाम यांनी तितक्यात समर्पक व विनयशीलपणो उत्तरे दिली. अमूल्या एस. कुमार या विद्यार्थिनीने सूत्नसंचालन केले. (प्रतिनिधी)
वैद्यकीय उपकरणांचे स्वदेशीकरण व्हावे
4वैद्यकीय शिक्षण घेणा:या विद्याथ्र्यानी उत्कृष्टतेची संस्कृती अंगीकारली पाहिजे. तसेच डॉक्टर आणि अभियंत्यांनी वैद्यकीय उपकरणांच्या स्वदेशीकरणासाठी एकत्र येऊन काम करायला हवे, अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केली.
4लष्करी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे संचालक व कमांडंट व्हाईस अॅडमिरल सुशील कुमार, अधिष्ठाता मेजर जनरल वेलू नायर, ग्रुप कॅप्टन शंकर सुब्रमण्यम, इंडिनय कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. व्ही. एम. कटोच, बेंगळुरू येथील इन्स्टिटय़ूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स येथील डॉ. हर्षा गौडा आदी उपस्थित होते. परिषदेमध्ये 65 वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे 7क्क् पदवी घेणारे विद्यार्थी सहभागी झाले. सुमारे 2क्क् रिसर्च पेपर प्रेङोंटेशन, चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, वैद्यकीय कार्यशाळा असे विविध कार्यक्रम या परिषदेत होणार आहेत.
4गुणवत्तेसाठी श्रेष्ठत्वाचा शोध घेण्याची गरज आहे. तसेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अखंड एकाग्रता ठेवायला हवी, असे डॉ. कलाम यांनी सांगितले.
4डॉ. कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान शास्त्रज्ञांकडून विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य नेहमीच प्रोत्साहनाचा स्रोत असतात, असे सुशील कुमार यांनी प्रास्ताविकात सांगितले.