शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 21:10 IST

सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला असून धुळे जिल्ह्यात देखील यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाने देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून धुळे जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा या सह विविध 15 मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करीत राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून धुळे जिल्ह्यात देखील कपाशी, सोयाबीन, मका यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच परतीच्या पावसाने देखील मोठ्या प्रमाणावर झोडपल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच दिवाळी अगोदर पिकाचे नुकसान भरपाई द्यावी, केंद्र सरकारने कापसाच्या आयात शुल्क माफ करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात आले.

सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राज्य सरकार एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात मश्गुल असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य शेतकरी वाऱ्यावर सोडला आहे असा राज्य सरकारवर घणाघात यावेळी करण्यात आला. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार