शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

सहकारी बँकांवर आता व्यवस्थापन मंडळ, रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 07:30 IST

ठेवीदार संचालकांच्या मनमानी कारभारला बळी पडू नये व त्यांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, यासाठी आता सहकारी बँकांवर संचालक मंडळाखेरीज स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमले जाणार आहे.

मुंबई : ठेवीदार संचालकांच्या मनमानी कारभारला बळी पडू नये व त्यांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, यासाठी आता सहकारी बँकांवर संचालक मंडळाखेरीज स्वतंत्र व्यवस्थापन मंडळ नेमले जाणार आहे. तसा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने तयार केला असून, त्यावर २४ जुलैपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत.सहकारी बँकांना परवाना रिझर्व्ह बँकेकडून मिळतो, पण बँकांवर देखरेख करण्याचे काम राज्याच्या सहकार विभागाकडे असते, तर बँक चालविण्याचे काम संचालक मंडळ करते. बँकेच्या दैनंदिन कामाकाजासह कर्ज मान्य करणे, कर्जांची वसुली व बँकेसाठी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करणे, अशी सर्वच कामे संचालक मंडळ करते, पण सहकारी बँकेत ठेवीदारांचा पैसा असल्याने त्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे. यासाठीच या बँकांवर व्यवस्थापन मंडळाची नेमणूक करून, त्या आता थेट रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.सहकारी बँकांसदर्भात रिझर्व्ह बँकेने वाय. एच. मालेगम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्या समितीने अशा व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याची शिफारस केली आहे.स्वागतार्ह निर्णयज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर वैशंपायन यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सहकारी बँकांमधील बहुतांश ठेवी या सर्वसामान्यांच्या असतात. त्यांचे हित यामुळे जोपासले जाईल. व्यवस्थापन मंडळातील सदस्यांची नेमणूक रिझर्व्ह बँकेकडूनच होईल. त्यामुळे सहकारी बँकांमध्ये व्यावसायिकता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्हच आहे.समितीने म्हटले आहे की, १०० कोटी रुपयांहून अधिक ठेवी असलेल्या सहकारी बँकांवर किमान पाच सदस्यांचे व्यवस्थापन मंडळ हवे. त्याहून कमी ठेवी असलेल्या बँकांमधील व्यवस्थापन मंडळांतील सदस्यांची संख्या तीन असावी. यापैकी १०० कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँकांवरील नेमणूक एका वर्षाच्या आत करावी, अशीही शिफारस समितीने केली आहे.