शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

...तर गावकारभाऱ्याचे पद रद्दसाठी प्रस्ताव

By admin | Updated: August 6, 2016 00:45 IST

३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करणार असून, जर कोणत्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरंप यांच्याकडे शौैचालय नसेल

पुणे : ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करणार असून, जर कोणत्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरंप यांच्याकडे शौैचालय नसेल, तर त्यांचे पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. गुरुवारी कंद यांनी समन्वय बैैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की या बैैठकीत स्वच्छतेबाबत आढावा घेतला. यात गेल्या महिनाभरात चांगली प्रगती होत आहे. सुमारे २० हजार शौचालये एका महिन्यात बांधली आहेत. १ लाख १२ हजारांपर्यंत बाकी आहेत. सद्य:स्थितीत आपल्याकडे ६ लाख ३६ हजार ६२३ कुटुंबे असून, त्यांपैैकी ५ लाख २४ हजार ३२१ कुटुंबांकडे शौचालये आहेत. या वेळी कंद यांना ज्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे शौचालये नाहीत किंवा ज्यांच्या गटात खूप काम करण्याचे बाकी आहे, त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार, असे विचारले असता, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्यांच्या बाबतीत तसा कायदा नाही; मात्र ज्या ग्रामपंचायत सदस्याकडे शौचालय नाही त्याचे कायद्याने पद रद्द होते. जर जिल्ह्यात यापैैकी कोणाकडे शौचालय नसल्याचे आढळून आले, तर त्यांचे पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. जिल्हा स्वच्छ करण्यासाठी यापुढे काही कठोर निर्णयही घेतले जातील, असेही ते म्हणाले. मी स्वत: शौचालयाचे उदघाटन केले आहे. त्यात लाज काय बाळगायची? शेवटी मानसिकता होणे गरजेचे आहे, असे सांगून ज्या तालुक्यात जेथे कमी काम झाले आहे, तेथे मी स्वत: भट देऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. (प्रतिनिधी)>भोर, वेल्हे लवकरच घोषणा१५ आॅगस्ट रोजी भोर, वेल्हे हगणदरीमुक्त करणार असल्याची घोषणा यापूर्वी प्रशासनाने केली आहे. याबाबत विचारले असता, भोर तालुक्यात फक्त ९००, तर वेल्हे तालुक्यात २४३ शौचालये बांधणे बाकी आहे. मुळशीच्या ग्रामसेवकांच्या टीमनेही येथे काम केले आहे. त्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत हे दोन्ही तालुके हगणदरीमुक्त होतील.>संपर्क तुटणाऱ्या गावांचा सर्व्हे करणारजिल्ह्यात पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यानंतर ज्या गावांचा संपर्क तुटतो, त्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. बऱ्याचदा नदीला पाणी आल्याने नदीकाठच्या गावांनाही धोका निर्माण होता. याचीही यादी तयार करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेला तेथे ज्या उपाययोजना करणे शक्य आहेत त्या केल्या जातील, असे कंद यांनी सांगितले.