शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

...तर गावकारभाऱ्याचे पद रद्दसाठी प्रस्ताव

By admin | Updated: August 6, 2016 00:45 IST

३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करणार असून, जर कोणत्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरंप यांच्याकडे शौैचालय नसेल

पुणे : ३१ डिसेंबरपर्यंत जिल्हा हगणदरीमुक्त करणार असून, जर कोणत्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरंप यांच्याकडे शौैचालय नसेल, तर त्यांचे पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. गुरुवारी कंद यांनी समन्वय बैैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की या बैैठकीत स्वच्छतेबाबत आढावा घेतला. यात गेल्या महिनाभरात चांगली प्रगती होत आहे. सुमारे २० हजार शौचालये एका महिन्यात बांधली आहेत. १ लाख १२ हजारांपर्यंत बाकी आहेत. सद्य:स्थितीत आपल्याकडे ६ लाख ३६ हजार ६२३ कुटुंबे असून, त्यांपैैकी ५ लाख २४ हजार ३२१ कुटुंबांकडे शौचालये आहेत. या वेळी कंद यांना ज्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे शौचालये नाहीत किंवा ज्यांच्या गटात खूप काम करण्याचे बाकी आहे, त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार, असे विचारले असता, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्यांच्या बाबतीत तसा कायदा नाही; मात्र ज्या ग्रामपंचायत सदस्याकडे शौचालय नाही त्याचे कायद्याने पद रद्द होते. जर जिल्ह्यात यापैैकी कोणाकडे शौचालय नसल्याचे आढळून आले, तर त्यांचे पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. जिल्हा स्वच्छ करण्यासाठी यापुढे काही कठोर निर्णयही घेतले जातील, असेही ते म्हणाले. मी स्वत: शौचालयाचे उदघाटन केले आहे. त्यात लाज काय बाळगायची? शेवटी मानसिकता होणे गरजेचे आहे, असे सांगून ज्या तालुक्यात जेथे कमी काम झाले आहे, तेथे मी स्वत: भट देऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. (प्रतिनिधी)>भोर, वेल्हे लवकरच घोषणा१५ आॅगस्ट रोजी भोर, वेल्हे हगणदरीमुक्त करणार असल्याची घोषणा यापूर्वी प्रशासनाने केली आहे. याबाबत विचारले असता, भोर तालुक्यात फक्त ९००, तर वेल्हे तालुक्यात २४३ शौचालये बांधणे बाकी आहे. मुळशीच्या ग्रामसेवकांच्या टीमनेही येथे काम केले आहे. त्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत हे दोन्ही तालुके हगणदरीमुक्त होतील.>संपर्क तुटणाऱ्या गावांचा सर्व्हे करणारजिल्ह्यात पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यानंतर ज्या गावांचा संपर्क तुटतो, त्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. बऱ्याचदा नदीला पाणी आल्याने नदीकाठच्या गावांनाही धोका निर्माण होता. याचीही यादी तयार करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेला तेथे ज्या उपाययोजना करणे शक्य आहेत त्या केल्या जातील, असे कंद यांनी सांगितले.