शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

राज्यकर्त्यांच्या ओंजळीने साहित्यिकांनी पाणी पिऊ नये; चित्रपटात प्रोपगंडा, साहित्यामध्ये नको - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 06:26 IST

उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले.

धर्मराज हल्लाळे -भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्य नगरी । उदगीर (जि. लातूर) : आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्य निर्मितीवर काही घटक भर देत आहेत. चित्रपट क्षेत्रात उघड उघड झालेला शिरकाव आपणास दिसतो आहेच. हेच साहित्यात झाले तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देत उद्घाटक शरद पवार यांनी साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये असा सल्ला शुक्रवारी येथे दिला.

उदयगिरी महाविद्यालयाच्या स्वरसम्राज्ञी लता मंगशेकर नगरीत भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर संमेलन अध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर मावजो, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,श्रीपाल सबनीस,माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,उद्योग मंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सध्याचा काळ मोठा कठीण : भारत सासणेसमाजात विभाजनवादी निरर्थक,पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. सगळीकडे दडे बसवणारी शांतता आहे. सर्वत्र ‘चतुर मौन’आहे. यात स्वार्थ आहे, तुच्छता आहे, भीती व दहशत आहे, अशा शब्दांत संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी अध्यक्षीय भाषणातून कोरडे ओढले. काळ तर मोठा कठीण आला आहे असा निर्देश करून ते म्हणाले की, आता आपण ‘भ्रमयुगात’ प्रवेश केला आहे. 

आगामी संमेलन गोव्यात भरवावे : दामोदर मावजो -दामोदर मावजो यांनी भाषणात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठीचा बळी देऊन गोव्यात कोकणीला राजभाषेचा दर्जा दिल्याचा आरोप केला. संमेलन गोव्यात भरवा. मराठीबरोबरच कोकणी भाषिकही ते यशस्वी करतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनSharad Pawarशरद पवारliteratureसाहित्यNCPराष्ट्रवादी काँग्रेस