शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दोन कार्यकारी संचालकांची पदोन्नती रद्द, सहा दिवसांत मूळ पदावर

By यदू जोशी | Updated: November 8, 2017 05:24 IST

बढतीतील आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता दोन सिंचन महामंडळांमध्ये दोन अधिका-यांना कार्यकारी संचालक म्हणून दिलेली पदोन्नती रद्द करण्याची वेळ आज जलसंपदा विभागावर आली.

मुंबई : बढतीतील आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता दोन सिंचन महामंडळांमध्ये दोन अधिका-यांना कार्यकारी संचालक म्हणून दिलेली पदोन्नती रद्द करण्याची वेळ आज जलसंपदा विभागावर आली.मुख्य अभियंता रसिक मदनलाल चौहान यांना कोकण सिंचन विकास महामंडळ (ठाणे) आणि मुख्य अभियंता तात्याराव नारायणराव मुंडे यांना कृष्णा खोरे सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदी १ नोव्हेंबर रोजी पदोन्नती देण्यात आली होती. ती आज रद्द करण्यात आली असून ते पूर्वीच्या मुख्य अभियंता पदावर कायम राहतील, असा आदेश जलसंपदा विभागाने आज काढला.बढत्यांमधील आरक्षणाचा राज्य शासनाचा जीआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता पण स्वत:च्या या आदेशाला १२ आठवड्यांची स्थगितीदेखील दिली होती. ही मुदत २७ आॅक्टोबर रोजी संपली. २८ तारखेला सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशास कोणतीही स्थगिती दिली नाही. त्यानंतर १ नोव्हेंबरला जलसंपदा विभागाने दोन मुख्य अभियंत्यांना कार्यकारी संचालक म्हणून पदोन्नती देण्याचा आदेश काढला.सर्वच प्रकारच्या पदोन्नतींना १३ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने २ नोव्हेंबर रोजी काढला. या पार्श्वभूमीवर, तात्याराव मुंडे आणि रसिक चौहान यांची पदोन्नती रद्द करण्यात येत असल्याचा जीआर जलसंपदा विभागाने आज काढला.त्या प्रकरणी उलटसुलट चर्चाकार्यकारी संचालक म्हणून दोघांना दिलेली पदोन्नती सहाच दिवसांत रद्द करण्याची नामुष्की जलसंपदा विभागावर आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे आदेश निघाले होते. ते काढून घेताना मुख्यमंत्र्यांना न्यायालयीन प्रकरणाची नेमकी कायदेशीर बाजू सांगण्यात आली नव्हती का या बाबत आता उलटसुलट चर्चा आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय