शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Jayant Patil : प्रकल्पग्रस्तांनी मंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा; बाधित घरांचे फेरसर्वेक्षण करून तत्काळ पुनर्वसन करा : जयंत पाटील यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:15 IST

Jayant Patil : धरणासाठी जमिनी घेताना एका शेतकऱ्याला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय दिला जात आहे, अशा तक्रारींचा पाढा प्रकल्पग्रस्तांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मांडला.

जव्हार : धरण बांधण्यासाठी सरकारने १३ वर्षांपूर्वी ९३.०१ कोटी रुपये खर्च केले असूनही ते अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदार आदिवासींची गेली १३ वर्षे सतत फसवणूक करत असून, याबाबत पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी आतापर्यंत कोणतीच पावले उचललेली नाहीत. किंबहुना ते अधिकाऱ्यांचीच बाजू घेत आहेत.

धरणासाठी जमिनी घेताना एका शेतकऱ्याला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय दिला जात आहे, अशा तक्रारींचा पाढा प्रकल्पग्रस्तांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मांडला. दरम्यान, बाधित घरांचे फेरसर्वेक्षण करून तत्काळ पुनर्वसन करा, असे आदेश जयंत पाटील यांनी दिले आहेत.

जव्हार तालुक्यातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे उभारण्यात येत असलेल्या जव्हार तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश पाटील यांनी शनिवारी दिले. राष्ट्रवादी परिवार मेळाव्यादरम्यान लेंडी धरणाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली.  प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधितांना प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन बाधितांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी व महसूल, पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी धरणस्थळावर बैठक घेतली. त्यावेळी  प्रकल्पग्रस्तांना द्यावयाचा भूसंपादन मोबदला रक्कम, भोतडपाडा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन याबाबत चर्चा केली. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याच्या सूचना दिल्या. 

लेंडी धरण येथे ढोलनाच व तारपा वादनने स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सुनील भुसारांसह पाटील यांनीही ताल धरला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवा सांबरे आदी उपस्थित होते.  

२०११ पासून धरणाचे काम बंद आहे. अद्याप २० टक्के भूसंपादन झाले असून, बाधितांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ९२ कोटी खर्च झाला आहे तर धरण पूर्ण करण्यासाठी ९३ कोटींची गरज आहे. - अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, जव्हार

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील