शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil : प्रकल्पग्रस्तांनी मंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा; बाधित घरांचे फेरसर्वेक्षण करून तत्काळ पुनर्वसन करा : जयंत पाटील यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 06:15 IST

Jayant Patil : धरणासाठी जमिनी घेताना एका शेतकऱ्याला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय दिला जात आहे, अशा तक्रारींचा पाढा प्रकल्पग्रस्तांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मांडला.

जव्हार : धरण बांधण्यासाठी सरकारने १३ वर्षांपूर्वी ९३.०१ कोटी रुपये खर्च केले असूनही ते अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदार आदिवासींची गेली १३ वर्षे सतत फसवणूक करत असून, याबाबत पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी आतापर्यंत कोणतीच पावले उचललेली नाहीत. किंबहुना ते अधिकाऱ्यांचीच बाजू घेत आहेत.

धरणासाठी जमिनी घेताना एका शेतकऱ्याला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय दिला जात आहे, अशा तक्रारींचा पाढा प्रकल्पग्रस्तांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यापुढे मांडला. दरम्यान, बाधित घरांचे फेरसर्वेक्षण करून तत्काळ पुनर्वसन करा, असे आदेश जयंत पाटील यांनी दिले आहेत.

जव्हार तालुक्यातील कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे उभारण्यात येत असलेल्या जव्हार तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश पाटील यांनी शनिवारी दिले. राष्ट्रवादी परिवार मेळाव्यादरम्यान लेंडी धरणाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली.  प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधितांना प्रकल्पग्रस्त व पुनर्वसन बाधितांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी व महसूल, पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी धरणस्थळावर बैठक घेतली. त्यावेळी  प्रकल्पग्रस्तांना द्यावयाचा भूसंपादन मोबदला रक्कम, भोतडपाडा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन याबाबत चर्चा केली. पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याच्या सूचना दिल्या. 

लेंडी धरण येथे ढोलनाच व तारपा वादनने स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सुनील भुसारांसह पाटील यांनीही ताल धरला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवा सांबरे आदी उपस्थित होते.  

२०११ पासून धरणाचे काम बंद आहे. अद्याप २० टक्के भूसंपादन झाले असून, बाधितांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ९२ कोटी खर्च झाला आहे तर धरण पूर्ण करण्यासाठी ९३ कोटींची गरज आहे. - अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, जव्हार

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील