प्रकल्प अडकले लालफितशाहीत!
By Admin | Updated: June 12, 2014 20:52 IST2014-06-12T20:46:24+5:302014-06-12T20:52:20+5:30
बालकामगार पुनर्वसन प्रकल्प लालफितशाहीत अडकल्याने बालकामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ वासून उभा आहे.

प्रकल्प अडकले लालफितशाहीत!
बुलडाणा : बालकामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी, पश्चिम वर्हाडातील बालकामगार पुनर्वसन प्रकल्प लालफितशाहीत अडकल्याने बालकामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आ वासून उभा आहे.
केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय बालकामगार पुनर्वसन प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यानुसार विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा आणि यवतमाळमध्ये बालकामगार प्रकल्प शाळा चालविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पाची सुरु करण्यासाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत २00९ मध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात १६४ बालकामगार आढळून आले. या सर्वेक्षणावर विचार करण्यासाठी शासनाने तीन वर्षांचा कालावधी लावला. त्यानंतर २0१२ मध्ये बैठक आयोजित करुन, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ह्ययशदाह्ण मार्फत बुलडाणा जिल्ह्यातील बालकामगारांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. २0१२ ते ३ मार्च २0१३ या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात आहे. दरवर्षी कामगार आणि जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारकडून अहवाल मागविला जातो. या अहवालावर ह्यकार्यवाही सुरु आहेह्ण असा शेराही दरवर्षीच शासनाकडून दिला जातो, हे विशेष.