शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाच दिवसांत तीन कोटींचा नफा

By admin | Updated: April 4, 2017 03:35 IST

बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांवरील बंदीनंतर किमतीत झालेल्या घसरणीमुळे नवी मुंबई आरटीओकडे नव्या ४९७ वाहनांची नोंद झाली

नवी मुंबई : बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांवरील बंदीनंतर किमतीत झालेल्या घसरणीमुळे नवी मुंबई आरटीओकडे नव्या ४९७ वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई आरटीओच्या तिजोरीत साडेतीन कोटींची भर पडली आहे. यात २०२ दुचाकींचा समावेश आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेल्या वाहनांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर संबंधित कंपन्यांनी उत्पादन संपवण्याच्या उद्देशाने वाहनांच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. या संधीचा फायदा घेत अनेकांनी नवे वाहन खरेदीचा मुहूर्त साधला आहे. अशा ४९७ वाहनांची नोंद नवी मुंबई आरटीओकडे मागील पाच दिवसांत झाली आहे. त्यामध्ये ११८ कारचा समावेश असून त्या युरो ४ इंजीनच्या आहेत. मात्र उर्वरित वाहने बीएस-३ प्रकारचे इंजीन असलेली आहेत. त्यात २०२ दुचाकी, ६३ ट्रक, २१ टेंपो, ७२ टॅक्सी व इतर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. वाहनांच्या नोंदणी शुल्कातून आरटीओच्या तिजोरीत एकूण ३ कोटी २७ लाख रुपयांची भर पडली आहे. पुढील काही दिवसांत त्यात भर पडण्याची शक्यता आहे.वाहनांसाठी नवे मानक लागू झाल्यानंतर जुन्या मानकाची वाहने बंद केली जातात. परंतु जुन्या मानकाची देखील वाहने विक्रीला अनुमती मिळावी अशी वाहन कंपन्यांची मागणी आहे. याकरिता ते न्यायालयात गेले असता, जुन्या मानकाच्या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे केलेल्या उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी त्यावर सूट देवून वाहने विकली जात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घेत अनेकांनी नव्या वाहनांची खरेदी केली आहे.