शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

समस्यांच्या विळख्यात अडकला पीएमपी डेपो

By admin | Updated: June 5, 2017 01:36 IST

५०० हून अधिक पीएमपीच्या फेऱ्या असलेला अपर डेपो म्हणजे समस्यांचे माहेरघर बनला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबिबवेवाडी : सुमारे ५०० हून अधिक पीएमपीच्या फेऱ्या असलेला अपर डेपो म्हणजे समस्यांचे माहेरघर बनला आहे. या डेपोमध्ये फक्त प्रवाशांनाच नाही, तर येथील कर्मचाऱ्यांनादेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या डेपोमध्ये जातानाच पीएमपी चालकांना रस्त्यावरील अतिक्रमणांचा सामना करावा लागतो. राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमण विभाग या ठिकाणी कधीच कारवाई करीत नाही, हे सत्य येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून सहन करीत आहेत. या डेपोमध्ये रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. डांबरीकरणदेखील केलेले नाही. त्यामुळे कायम चिखलातून वाट काढत प्रवाशांना व पीएमपी कर्मचाऱ्यांनादेखील दिवस काढावा लागतो. या डेपोमधील सर्वांत मोठी समस्या म्हणजे, या डेपोच्या जागेत खासगी वाहनचालकांनी पार्किंग सुरू केल्यामुळे बस या थांब्यापासून सुमारे ४०० मीटर दूर लावाव्या लागतात. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या मुख्य थांब्यावर बसण्यासाठी बाकडेच नाहीत. बस थांब्यात बसणे म्हणजे साक्षात रोगाला आमंत्रण देणे इतकी दुरवस्था येथील बसथांब्याची झालेली आहे. एका कोपऱ्याला स्वच्छतागृह आहे, नागरिकांना ते दिसतदेखील नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, प्रवाशांना सूचना देण्यासाठी माईक नाही, बसचे वेळापत्रकही नाही, अशा एक ना अनेक समस्या या डेपोपध्ये पाहायला मिळत आहेत.येथील अनधिकृत उभ्या केलेल्या गाड्यांवर सहकारनगर वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, ती केली जात नाही. या डेपोमध्ये नागरिकांना व कर्मचाऱ्यांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सुमारे ६५ शेड्यूलमध्ये १६ मार्गांवर या डेपोमधून गाड्या जातात. अनेक मार्गांवरील गाड्या बंद केल्या आहेत. मात्र, याची माहिती आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला देता येणार नाही, असे येथील पीएमपी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.पीएमपीचे उपायुक्त तुकाराम मुंढे यांनी मागील दोन महिन्यांत केलेल्या अनेक सुधारणांमुळे पीएमपी बदलू लागली आहे. मात्र, बाकीच्या सुविधा करण्यासाठी इतर विभागाची साथ त्यांना मिळाली तर प्रवाशांची संख्या वाढेल. ४सार्वजनिक वाहतूक वाढल्यामुळे पुणे शहराला वाहतूककोंडीच्या अभिशापातून मुक्त करता येईल. प्रदूषणावरही काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. मात्र, इतर विभागातील अधिकारी त्यांना साथ देतील का, असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा आहे.येथून कात्रजला जाण्यासाठी बस सुरू करावी. ही बस नसल्यामुळे तीन किमी जाण्यासाठी आम्हाला १० किमी उलटे फिरून जावे लागते.- गणपत कासवा, प्रवासीपीएमपी बसची दुरवस्था झाली असून, खिडक्या तुटल्या आहेत, अनेकजण गुटखा खाऊन थुंकलेले असतात. त्यामुळे स्वच्छता करावी. - श्रीराज दुगड, प्रवासी