शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेसला फटका - नारायण राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 19:30 IST

राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले  काय ज्याने परत सत्ता येईल.

सिंधुदुर्गनगरी : राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले  काय ज्याने परत सत्ता येईल. त्यामुळे जनता पुन्हा काँग्रेसला सत्ता देईल या भ्रमात  त्यांनी राहू नये असा सल्ला खासदार नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला दिला.  काँग्रेसने सध्या सत्ता बदलून घेण्यासाठी जन संघर्ष यात्रा सुरू केली आहे, या पार्श्वभूमिवर ते पत्रकारांशी बोलत होते. पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नीतेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.कोल्हापूर येथून शुक्रवारपासून काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू झाली. या पार्श्वभूमिवर बोलताना राणे म्हणाले, काँग्रेस सत्तेत असताना काही करू शकली नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना चांगले काम केले असते. तर जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले असते. आता जनसंघर्ष यात्रा काढून त्याचा काही फायदा काँग्रेसला होईल, असे आपल्याला वाटत नाही.मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या स्थितीबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, हा महामार्ग गणपतीच्या अगोदर व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लेखी पत्र दिले आहे. महामार्गाची दुरावस्था होणे याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची आहे. ठेकेदाराने लक्ष न दिल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे असा ठेकेदार असू नये असे आपले मत आहे. आज जिल्ह्यात मंत्री चंद्रकांत पाटील येत आहेत त्यांची कणकवली येथे आपण भेट घेणार आहोत. त्यावेळीही या स्थितीबाबत आपलं मत मांडणार असेही राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.   १२ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळावर विमानाची चाचणी होणार आहे. त्याठिकाणी आवश्यक त्या प्राथमिक सुविधा तयार करणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी आपल्याला १२ सप्टेंबर रोजी तिथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी त्यादिवशी तिथे उपस्थित राहणार असेही राणे यांनी यावेळी स्पस्ट केले.  

मराठा आरक्षणाबाबत आचारसंहिते अगोदर प्रतिज्ञापत्र सादर करावे       मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी विचारले असता नारायण राणे म्हणाले मराठा आरक्षण हा विषय पुढे पुढे ढकलून चालणार नाही. खरे म्हणजे महाराष्ट्र शासनाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून हा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी  डिसेंबर  जानेवारी असे करत राहण्याची आवश्यकता नाही. आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याची क्षमता या सरकारमध्ये आहे. त्यामुळे आचार संहितेच्या अगोदर हे प्रतिज्ञापत्र शासनाने न्यायालयात हजर करावे, अन्यथा निवडणुकांमध्ये त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असेही ते म्हणाले.सी वर्ल्ड प्रकल्प आम्ही गुंडाळू देणार नाहीसी वर्ल्ड प्रकल्प गुंडाळला जाणार याबाबत चर्चा आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता हा प्रकल्प आपण कसाच गुंडाळू देणार नाही. तसे मला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले आहे. लवकरच संयुक्त बैठक होईल आणि त्यात पुढील दिशा ठरेल असेही राणे यांनी यावेळी स्पस्ट केले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणcongressकाँग्रेस