शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

रोजगाराच्या संधी, पिण्याचे पाणी, कृषीकर्ज उपलब्धतेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:03 IST

कौल महाराष्ट्रचा : राज्यातील मतदारांना भेडसावतात या समस्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील प्रचार लोकांच्या दैनंदिन प्रश्नांऐवजी वैयक्तिक हल्ले, अनावश्यक गोष्टींवर भर तसेच आरोप-प्रत्यारोपांत हरवला असल्याची टीका होत असताना महाराष्ट्रातील लोकांचे मात्र रोजगाराच्या चांगल्या संधी, पिण्याचे पाणी आणि कृषीकर्ज उपलब्धता हे प्राधान्यक्रमाचे विषय असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने केलेल्या मतदार सर्वेक्षणावर आधारित अहवालातून पुढे आले आहे.

महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणारा हा अहवाल राज्यातील मतदारांनी नमूद केल्याप्रमाणे १0 सर्वांत महत्त्वाच्या प्रशासकीय समस्यांवर भर देतो. मतदारांचे प्राधान्यक्रम प्रतिसादकांच्या मते सरकारच्या त्या समस्यांवरील कामगिरीच्या संदर्भात अभ्यासण्यात आले आहेत. सर्वेक्षणात महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमधील सुमारे २४,000 प्रतिसादकांची मते तपासण्यात आली.४२.१0 टक्के मतदारांचे रोजगाराच्या चांगल्या संधी, ३७.५३ टक्के लोकांचे पिण्याचे पाणी आणि २९ टक्के प्रतिसादकांचे कृषीकर्ज उपलब्धता याप्रमाणे पहिले तीन प्राधान्यक्रम आहेत. मतदारांच्या सर्वोच्च तीन प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी रोजगाराच्या चांगल्या संधींबाबत (५ पैकी २.४८), पिण्याचे पाणी (२.५२) आणि कृषी कर्ज उपलब्धता (२.३५) म्हणजे सरासरीपेक्षा कमी अभिप्राय असल्याचे नोंदवले गेले आहे.विशिष्ट शासन समस्यांबाबत मतदारांचे प्राधान्य. त्या समस्यांसंबंधी सरकारच्या कामगिरीबाबत मतदारांनी दिलेले रेटिंग आणि मतदान वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक याचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.

सरकारने बियाणे/खतांसाठी कृषी सवलत देण्याबाबत (२.२४) आणि शेतीसाठी वीजपुरवठा (२.२७) करण्याबाबत लोकांच्या मते अत्यंत वाईट कामगिरी केली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मतदारांचे सर्वोच्च तीन प्राधान्यक्रम कृषीकर्ज उपलब्धता (५१%), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (४९%) आणि कृषी उत्पादनांना चांगला बाजारभाव (४६%) हे होते. ग्रामीण मतदारांच्या तीन सर्वोच्च प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी कृषीकर्ज उपलब्धतेबाबत (५ पैकी २.३५), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (२.२९) आणि कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव (२.१७) यांबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदवले गेले.ग्रामीण मतदारांचे प्राधान्यक्रम51% कृषी कर्ज उपलब्धता49% शेतीसाठी पाण्याची उपलब्धता46% कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव46% सरकारची बियाणे/खतांसाठी कृषी सवलत38% शेतीसाठी वीज37% रोजगाराच्या चांगल्या संधी33% पिण्याचे पाणी27% चांगली वैद्यकीय सेवा23% नदीतून वाळू उपसा21% चांगले रस्ते

महाराष्ट्रातील शहरी मतदारांसाठी तीन सर्वोच्च प्राधान्यक्रम48%चांगल्या रोजगार संधी43%पिण्याचे पाणी35%वाहतूक-कोंडीग्रामीण महाराष्ट्रात मतदारांचे सर्वोच्च तीन प्राधान्यक्रम कृषीकर्ज उपलब्धता (५१%), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (४९%) आणि कृषी उत्पादनांना चांगला बाजारभाव (४६%) हे होते. ग्रामीण मतदारांच्या तीन सर्वोच्च प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी कृषीकर्ज उपलब्धतेबाबत (५ पैकी २.३५), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (२.२९) आणि कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव (२.१७) यांबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदवले गेले.

शहरी मतदारांच्या सर्वोच्च तीन प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी चांगल्या रोजगाराच्या संधींबाबत (२.२७), पिण्याचे पाणी (२.३२) आणि वाहतूककोंडी (२.१०) याबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, ध्वनिप्रदूषण (२.१७) आणि चांगले रस्ते (२.३२) याबाबत सरकारने अत्यंत वाईट कामगिरी केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :jobनोकरीFarmerशेतकरीWaterपाणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक