शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या संधी, पिण्याचे पाणी, कृषीकर्ज उपलब्धतेला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:03 IST

कौल महाराष्ट्रचा : राज्यातील मतदारांना भेडसावतात या समस्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील प्रचार लोकांच्या दैनंदिन प्रश्नांऐवजी वैयक्तिक हल्ले, अनावश्यक गोष्टींवर भर तसेच आरोप-प्रत्यारोपांत हरवला असल्याची टीका होत असताना महाराष्ट्रातील लोकांचे मात्र रोजगाराच्या चांगल्या संधी, पिण्याचे पाणी आणि कृषीकर्ज उपलब्धता हे प्राधान्यक्रमाचे विषय असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने केलेल्या मतदार सर्वेक्षणावर आधारित अहवालातून पुढे आले आहे.

महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणारा हा अहवाल राज्यातील मतदारांनी नमूद केल्याप्रमाणे १0 सर्वांत महत्त्वाच्या प्रशासकीय समस्यांवर भर देतो. मतदारांचे प्राधान्यक्रम प्रतिसादकांच्या मते सरकारच्या त्या समस्यांवरील कामगिरीच्या संदर्भात अभ्यासण्यात आले आहेत. सर्वेक्षणात महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमधील सुमारे २४,000 प्रतिसादकांची मते तपासण्यात आली.४२.१0 टक्के मतदारांचे रोजगाराच्या चांगल्या संधी, ३७.५३ टक्के लोकांचे पिण्याचे पाणी आणि २९ टक्के प्रतिसादकांचे कृषीकर्ज उपलब्धता याप्रमाणे पहिले तीन प्राधान्यक्रम आहेत. मतदारांच्या सर्वोच्च तीन प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी रोजगाराच्या चांगल्या संधींबाबत (५ पैकी २.४८), पिण्याचे पाणी (२.५२) आणि कृषी कर्ज उपलब्धता (२.३५) म्हणजे सरासरीपेक्षा कमी अभिप्राय असल्याचे नोंदवले गेले आहे.विशिष्ट शासन समस्यांबाबत मतदारांचे प्राधान्य. त्या समस्यांसंबंधी सरकारच्या कामगिरीबाबत मतदारांनी दिलेले रेटिंग आणि मतदान वर्तणुकीवर परिणाम करणारे घटक याचा त्यात प्रामुख्याने समावेश होता.

सरकारने बियाणे/खतांसाठी कृषी सवलत देण्याबाबत (२.२४) आणि शेतीसाठी वीजपुरवठा (२.२७) करण्याबाबत लोकांच्या मते अत्यंत वाईट कामगिरी केली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मतदारांचे सर्वोच्च तीन प्राधान्यक्रम कृषीकर्ज उपलब्धता (५१%), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (४९%) आणि कृषी उत्पादनांना चांगला बाजारभाव (४६%) हे होते. ग्रामीण मतदारांच्या तीन सर्वोच्च प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी कृषीकर्ज उपलब्धतेबाबत (५ पैकी २.३५), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (२.२९) आणि कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव (२.१७) यांबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदवले गेले.ग्रामीण मतदारांचे प्राधान्यक्रम51% कृषी कर्ज उपलब्धता49% शेतीसाठी पाण्याची उपलब्धता46% कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव46% सरकारची बियाणे/खतांसाठी कृषी सवलत38% शेतीसाठी वीज37% रोजगाराच्या चांगल्या संधी33% पिण्याचे पाणी27% चांगली वैद्यकीय सेवा23% नदीतून वाळू उपसा21% चांगले रस्ते

महाराष्ट्रातील शहरी मतदारांसाठी तीन सर्वोच्च प्राधान्यक्रम48%चांगल्या रोजगार संधी43%पिण्याचे पाणी35%वाहतूक-कोंडीग्रामीण महाराष्ट्रात मतदारांचे सर्वोच्च तीन प्राधान्यक्रम कृषीकर्ज उपलब्धता (५१%), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (४९%) आणि कृषी उत्पादनांना चांगला बाजारभाव (४६%) हे होते. ग्रामीण मतदारांच्या तीन सर्वोच्च प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी कृषीकर्ज उपलब्धतेबाबत (५ पैकी २.३५), शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (२.२९) आणि कृषी उत्पादनांना जास्त बाजारभाव (२.१७) यांबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नोंदवले गेले.

शहरी मतदारांच्या सर्वोच्च तीन प्राधान्यक्रमांवर सरकारची कामगिरी चांगल्या रोजगाराच्या संधींबाबत (२.२७), पिण्याचे पाणी (२.३२) आणि वाहतूककोंडी (२.१०) याबाबत सरासरीपेक्षा कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, ध्वनिप्रदूषण (२.१७) आणि चांगले रस्ते (२.३२) याबाबत सरकारने अत्यंत वाईट कामगिरी केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :jobनोकरीFarmerशेतकरीWaterपाणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक