शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

श्रीक्षेत्र माहूरगडावरील नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:10 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे.

श्रीक्षेत्र माहूर (जि. नांदेड) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने गडावर येणाºया भाविकांच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर रोजी येथे नवरात्र महोत्सव नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.

माहूरगडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या काळात राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक आई रेणुकेच्या दर्शनासाठी येतात. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, भाविकांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना व यात्रेचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व रेणुकादेवी संस्थानच्या शासकीय व अशासकीय विश्वस्तांची जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नियोजन आढावा बैठक बोलावली होती.

यावेळी आरोग्य विभागाकडून रेणुकादेवी मंदिर, दत्तशिखर, अनुसयामाता मंदिर, बसस्थानक, टी पॉर्इंट अशा ५ ठिकाणी आरोग्यपथक राहणार असून ३ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार आहेत. नगरपंचायत कार्यालयाकडून ठिकठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी व फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून भाविकांना गडावर जाण्यासाठी सुसज्ज ८० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहार, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, डॉ.व्ही. एन. भोसले, अभियंता रवींद्र उमाळे, सचिन पांचाळ व सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

नवरात्र यात्राकाळात कुठल्याही कर्मचाºयांनी कर्तव्यात कसूर करु नये, काही समस्या उद्भवल्यास थेट मला संपर्क करा. कर्मचारी हयगय केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिला. मातृतीर्थ तलाव, सर्वतीर्थ व अन्य तलाव अथवा धबधब्याच्या ठिकाणी जीवरक्षक दलाची नेमणूक करुन ‘नो सेल्फी’ असे फलक लावावे, रेणुकादेवी ते दतशिखर मंदिरापर्यंत जाणाºया रस्त्यात काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्याने अशा धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावे, मंदिरात दर्शनासाठी एकाच वेळा किती भाविक दर्शन घेऊ शकतात याची माहिती सा. बां. विभागाने पोलीस प्रशासनाला द्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी केली.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून यात्राकाळात नऊ दिवस अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश ठेवला जाणार असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Navratriनवरात्री