शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र माहूरगडावरील नवरात्र महोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 21:10 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे.

श्रीक्षेत्र माहूर (जि. नांदेड) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूरगडावर प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने गडावर येणाºया भाविकांच्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर रोजी येथे नवरात्र महोत्सव नियोजन आढावा बैठक घेण्यात आली.

माहूरगडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होणार आहे. या काळात राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक आई रेणुकेच्या दर्शनासाठी येतात. भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, भाविकांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना व यात्रेचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व रेणुकादेवी संस्थानच्या शासकीय व अशासकीय विश्वस्तांची जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नियोजन आढावा बैठक बोलावली होती.

यावेळी आरोग्य विभागाकडून रेणुकादेवी मंदिर, दत्तशिखर, अनुसयामाता मंदिर, बसस्थानक, टी पॉर्इंट अशा ५ ठिकाणी आरोग्यपथक राहणार असून ३ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार आहेत. नगरपंचायत कार्यालयाकडून ठिकठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी व फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून भाविकांना गडावर जाण्यासाठी सुसज्ज ८० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहार, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, डॉ.व्ही. एन. भोसले, अभियंता रवींद्र उमाळे, सचिन पांचाळ व सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

नवरात्र यात्राकाळात कुठल्याही कर्मचाºयांनी कर्तव्यात कसूर करु नये, काही समस्या उद्भवल्यास थेट मला संपर्क करा. कर्मचारी हयगय केल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिला. मातृतीर्थ तलाव, सर्वतीर्थ व अन्य तलाव अथवा धबधब्याच्या ठिकाणी जीवरक्षक दलाची नेमणूक करुन ‘नो सेल्फी’ असे फलक लावावे, रेणुकादेवी ते दतशिखर मंदिरापर्यंत जाणाºया रस्त्यात काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता असल्याने अशा धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावावे, मंदिरात दर्शनासाठी एकाच वेळा किती भाविक दर्शन घेऊ शकतात याची माहिती सा. बां. विभागाने पोलीस प्रशासनाला द्यावी, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी केली.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून यात्राकाळात नऊ दिवस अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश ठेवला जाणार असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Navratriनवरात्री