शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 18:37 IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले ...

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आघाडीत जाणार का अशी चर्चा सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने केलाला हा आरोप माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला असून, आम्ही भाजपची बी टीम कसे ? याचा खुलासा करा मग आघाडीची चर्चा करू असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत आणि निकालानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. मुस्लीम आणि दलित मतांची विभागणी करून, भाजपला फायदा होण्यासाठीच वंचितची स्थापना झाली असल्याचे काँग्रेस नेते त्यावेळी बोलत होते. मात्र तीच काँग्रेस सोबत येण्यासाठी आता आवाहन करत असल्याचे आंबेडकर म्हणाले. मात्र आमच्यावर 'बी' टीम असल्याच्या आरोपाचा काँग्रेसने आधी खुलासा करावा. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे आंबेडकर म्हणाले.

लोकसभेत काँग्रेसच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे समजोता होवू शकला नाही. आताही फक्त पत्र व्यवहार पलीकडे काहीच होत नाही. महाआघाडी सोबत जाणार नाही अशी टोकाची अजून भूमिका घेतली नाही. मात्र काँग्रेसने एकतर यावर बोलवा, नाही तर हा विषय थांबवावा असेही आंबेडकर म्हणाले. मात्र 'बी' टीमचा आधी त्यांनी खुलासा करावा, त्यांनतरच पुढील चर्चा होईल असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. 

पक्षप्रवेशावर बोलताना आंबेकर म्हणाले की, आयाराम-गयाराम हे राजकरणात सुरूच असते. त्याने पक्षाला काहीच फरक पडत नाही. राष्ट्रवादी-काँग्रेसचे अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. आतापर्यंत ११०० उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, ह्या महिन्याच्या शेवटी यादी जाहीर करणार असल्याचे सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले.