शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 18:37 IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले ...

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आघाडीत जाणार का अशी चर्चा सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने केलाला हा आरोप माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला असून, आम्ही भाजपची बी टीम कसे ? याचा खुलासा करा मग आघाडीची चर्चा करू असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत आणि निकालानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. मुस्लीम आणि दलित मतांची विभागणी करून, भाजपला फायदा होण्यासाठीच वंचितची स्थापना झाली असल्याचे काँग्रेस नेते त्यावेळी बोलत होते. मात्र तीच काँग्रेस सोबत येण्यासाठी आता आवाहन करत असल्याचे आंबेडकर म्हणाले. मात्र आमच्यावर 'बी' टीम असल्याच्या आरोपाचा काँग्रेसने आधी खुलासा करावा. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे आंबेडकर म्हणाले.

लोकसभेत काँग्रेसच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे समजोता होवू शकला नाही. आताही फक्त पत्र व्यवहार पलीकडे काहीच होत नाही. महाआघाडी सोबत जाणार नाही अशी टोकाची अजून भूमिका घेतली नाही. मात्र काँग्रेसने एकतर यावर बोलवा, नाही तर हा विषय थांबवावा असेही आंबेडकर म्हणाले. मात्र 'बी' टीमचा आधी त्यांनी खुलासा करावा, त्यांनतरच पुढील चर्चा होईल असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. 

पक्षप्रवेशावर बोलताना आंबेकर म्हणाले की, आयाराम-गयाराम हे राजकरणात सुरूच असते. त्याने पक्षाला काहीच फरक पडत नाही. राष्ट्रवादी-काँग्रेसचे अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. आतापर्यंत ११०० उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, ह्या महिन्याच्या शेवटी यादी जाहीर करणार असल्याचे सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले.