शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 18:37 IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले ...

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आघाडीत जाणार का अशी चर्चा सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसने केलाला हा आरोप माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला असून, आम्ही भाजपची बी टीम कसे ? याचा खुलासा करा मग आघाडीची चर्चा करू असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत आणि निकालानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. मुस्लीम आणि दलित मतांची विभागणी करून, भाजपला फायदा होण्यासाठीच वंचितची स्थापना झाली असल्याचे काँग्रेस नेते त्यावेळी बोलत होते. मात्र तीच काँग्रेस सोबत येण्यासाठी आता आवाहन करत असल्याचे आंबेडकर म्हणाले. मात्र आमच्यावर 'बी' टीम असल्याच्या आरोपाचा काँग्रेसने आधी खुलासा करावा. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे आंबेडकर म्हणाले.

लोकसभेत काँग्रेसच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे समजोता होवू शकला नाही. आताही फक्त पत्र व्यवहार पलीकडे काहीच होत नाही. महाआघाडी सोबत जाणार नाही अशी टोकाची अजून भूमिका घेतली नाही. मात्र काँग्रेसने एकतर यावर बोलवा, नाही तर हा विषय थांबवावा असेही आंबेडकर म्हणाले. मात्र 'बी' टीमचा आधी त्यांनी खुलासा करावा, त्यांनतरच पुढील चर्चा होईल असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. 

पक्षप्रवेशावर बोलताना आंबेकर म्हणाले की, आयाराम-गयाराम हे राजकरणात सुरूच असते. त्याने पक्षाला काहीच फरक पडत नाही. राष्ट्रवादी-काँग्रेसचे अनेक जण आपल्या संपर्कात असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले. आतापर्यंत ११०० उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, ह्या महिन्याच्या शेवटी यादी जाहीर करणार असल्याचे सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले.