शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वंचित आघाडीच बहुजनांना सत्तेपासून वंचित ठेवणार; रामदास आठवलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:18 IST

रामदास आठवले यांचा आरोप. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘प्रयोगा’चा युतीलाच थेट लाभ मिळणार असल्याचे मत

- सुरेंद्र राऊत  यवतमाळ : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडी स्थापन करून नवीन राजकीय प्रयोग केला. मात्र, या आघाडीमुळे बहुजन समाजच सत्तेपासून वंचित राहणार आहे. या आघाडीचा थेट लाभ भाजपा-शिवसेना महायुतीला होणार असल्याचा आरोप रिपाइंचे (ए) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. 

आठवले यवतमाळात मुक्कामी होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. आठवले म्हणाले, आमचा युतीला उघड पाठींबा आहे. तर आंबेडकर छुप्या पद्धतीने युतीची मदत करीत आहेत. रिपाइं आठवले गटाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवाराचा तन-मन-धनाने प्रचार करणार आहे. यवतमाळात प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच विदर्भातील नाराज रिपाइं पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात त्यांनी मान-सन्मान मिळत नसल्याने महायुतीत राहण्याबाबतचा फेरविचार केला जावा, अशी मागणी केली. 

याकडे आठवलेंचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या सर्व नाराज रिपाइं कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून नाराजी दूर केली जाईल. रिपाइं कार्यकर्ते प्रतिकुल परिस्थितीतही एकदिलाने काम करतील. वंचित आघाडीमुळे  काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे मत विभाजन अटळ आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची मतेच ‘मायनस’ होणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम