शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदे गटाने विलीन व्हावे आणि मगच सरकार...", भाजपने अट घातल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 11:04 IST

Prakash Ambedkar : सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. पण, एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडणार की वेगळा गट करून भाजपला पाठिंबा देणार, याबाबत संभ्रम आहे. यातच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट एकनाथ शिंदे गटासमोर ठेवलीय का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. एकनाथ शिंदे गटाने भाजपमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव ठेवल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह देत म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. "एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?",  असे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीपासूनच आपण शिवसैनिकच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत, अशी शक्यता आहे. पण, ते वेगळा गट करूनच भाजपला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होतील, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेत सर्वात मोठे बंड करून ठाकरे सरकारला हादरा दिल्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचे एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकर काय बोलतात, याचा भाजपशी काही संबंध नाही- अतुल भातखळकर भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही. याआधीही त्यांनी अशी अनेकदा चित्रविचित्र वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेत सध्या जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी, कामासाठी संघर्ष करत राहू. हे सरकार अंतर्विरोधानं भरलेले सरकार आहे. तिन्ही पक्ष एकमेकांशी भांडतात, हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झाले आहे, असेही अतुल भातखळकर म्हणाले.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा